एक्स्प्लोर

आमचं उष्ट कोणी खाऊ नये.. औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला

औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या स्वागताच्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आलाय. यावरुन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.

जळगाव : हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर करू पाहत असलं तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंबगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करीत आहे. त्यामुळे आमचं उष्ट कोणी खाऊ नये, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद येथे लावलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आलाय. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावण्यात आलंय. या बॅनरवर मनसेकडून पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आलाय. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केलीय. औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरल्याची आठवण त्यांनी करुन देत आमचं उष्ट कोणी खाऊ नये, असा खोचक टोलाही मनसेला लगावला. बंगल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंत्री देत नाहीत मंत्र्यांच्या बंगल्यावर दुरुस्तीसाठी मोठा खर्च केला जात आहे. या विषयावर विरोधक सरकारला घेरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की दुरुस्तीचे प्रस्ताव हे काही मंत्री बनवत नाही, ते वेगवेगळ्या एजन्सीज ठरवतात. त्या एजन्सीच्या पाहणीनुसार दुरुस्तीची गरज असेल तर ती दुरुस्ती केली जाते. मंत्र्यांच्या बंगल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यांच्या सोयीचा दृष्टीने गरज असेल तर ते दुरुस्त केलं जातं ते कोणी मंत्र्यांनी ठरवलेलं नाही. मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी? आमचं सरकार पाच वर्ष चालणार भाजप काहीही म्हणत असलं तरी आमचं सरकार पाच वर्षे जोरदार चालेल. त्यांना त्यांचे आमदार सांभाळून ठेवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल उंचावून ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा सत्तेत येत असल्याचे सांगत राहावे लागत आहे. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार असल्यचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या सरकारी निर्णयाची पाठराखण करताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की या निर्णयामुळे एक दिवसाचा शासनाचा खर्च वाचला, विजेचा खर्च वाचला, ट्राफिक जाम वाचलं त्यामुळे यांनी उगाच बोंबाबोंब करू नये. शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग करावा - शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही अशी सामाजिक परिस्तिती सध्या समाज्यात पाहायला मिळत आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की तरुणांनी शासनाची मदत घेऊन उद्योग व्यवसाय करावा, मुलींनी ही नोकरीवाल्याची अपेक्षा न ठेवता चांगला उद्योग करणाऱ्याशी विवाह करायला हवा. बँकेमध्ये अनेक ठिकाणी परराज्यातील अधिकारी असल्याने त्यांच्याशी संवाद साधताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हे पाहता ज्या राज्यातील अधिकारी असेल त्याला त्याच राज्यात नेमणूक दिली तर त्यांच्या दृष्टीने ही फायदेशीर ठरेल आणि जनतेच्याही दृष्टीने फायदेशीर राहणार असल्याने आपण केंद्र सरकारकडे ही मागणी करीत असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. MNS | राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, बॅनरवर हिंदुत्व जननायक असाही उल्लेख | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget