एक्स्प्लोर

ठाकरे सरकार म्हणजे प्रगती नाही तर स्थगिती सरकार : देवेंद्र फडणवीस

शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं असाही आरोप फडणवीस यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. तीन महिन्यात या सरकारने एक काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. आतापर्यंत जी कामे सुरळीतपणे सुरू होती त्या कामांना स्थगिती देण्यातं काम सरकारने केले आहे. त्यामुळे हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर जुन्या सरकारच्या चांगल्या योजनांना स्थगिती दिली नाही, उलट जनतेसाठी त्या सुरू ठेवल्या असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चा असून यामध्ये तथ्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ठ केले आहे. फडणवीस म्हणाले, मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा सरकार येत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून जाणार नाही. संघर्ष करून पुन्हा सरकार आणणार. जनतेने आपल्याला जागा दिल्या आहेत. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. लोकशाहीमध्ये जनतेच्या मनातल सरकार चालतं त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. Fadnavis on Nighlife | "शेतकऱ्यांच्या नाईटलाईफची व्यवस्था कधी करणार?" नाईटलाईफवरुन देवेंद्र फडणवीसांची टीका तीन पक्षाचे सरकारपूर्वी सांगितल्याप्रमाणे ऑटो रिक्षा सरकार आहे. हे तीन चाकाची सरकार वेगळ्या दिशेने काम करते. सरकार फार काळ टिकणार नाही. विरोधी पक्षात बसवून या सरकारला हलवण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. एवढंच नाही तर शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं असाही आरोप फडणवीस यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही फडणवीस यांनी दिला. एवढ्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका असाही खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला. आम्ही भाजपचं सरकार आल्यावर मराठा समाजाला दोन वचन दिली होती एक आरक्षण दिलं पाहिजे आणि अरबी समुद्रात शिवस्मारक ती दोन्ही आम्ही मार्गी लावली आहेत. मागासवर्गीय रिपोर्टच्या आधारे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. परंतु सरकार गंभीर नाही, सरकार गंभीर नसलं तरी आपल्याला लक्ष्य ठेवाव लागणार आहे. मराठा समाजातील तरुणांचं आंदोलन सुरु आहे. सरकार का दखल घेतं नाही मला समजत नाही. शिवस्मारकाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी आदेशामुळे कामं थांबल आहे. सध्याच्या सरकारने काम थांबू देऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला हवी हे सरकार फार काळ ठिकणार नाही. संबंधित बातम्या :  जनतेच्या पैशाची उधळपट्टी नको, 'झोपु'च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याचा कट, पुण्यात तक्रार दाखल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील जुन्नरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू, शेतात काम करताना झाला दुर्दैवी अंत
पुण्यातील जुन्नरमध्ये उष्माघातानं महिलेचा मृत्यू, शेतात काम करताना झाला दुर्दैवी अंत
वाशिममध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू 
वाशिममध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू 
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
धक्कादायक! अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली घटना
धक्कादायक! अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली घटना

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget