एक्स्प्लोर

'मित्राने बेईमानी केली, असंगाशी संग केला आणि सत्ता गेली' : देवेंद्र फडणवीस

सत्तांतराच्या चर्चेबाबत विचारलं असता फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, आम्ही सत्तातरांकडे डोळे लावून बसलो नाहीये. हे सरकार नाकर्ते आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. आम्ही सातत्याने सरकारचे लक्ष वेधण्याचं काम करत आहोत, असं ते म्हणाले.

सोलापूर : मित्राने बेईमानी केली,असंगांशी संग केला आणि सत्ता गेली, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात बोलताना केलं आहे. अनैसर्गिक युती केलं की काय होतं ते सोलापुरात पाहिलं. नेत्यांचे फोटो टाकले नाही म्हणून धुमचक्री झाली, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तांतराच्या चर्चेबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तातरांकडे डोळे लावून बसलो नाहीये. हे सरकार नाकर्ते आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. आम्ही सातत्याने सरकारचे लक्ष वेधण्याचं काम करत आहोत. फार काळ असा असंगांचा संघ टिकणार नाही. सत्तांतरासंदर्भात दानवे, दरेकर याना विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले. ज्या दिवशी सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की,  आपल्या वक्तव्यावरून रोज पलटी खाणारे हे महाराष्ट्र सरकार आहे. शेतकऱ्यांना मदत करतो म्हणाले मात्र अजून अनेकांना मदत मिळालेली नाही, असं फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या काळात एकाही घटकाला यांनी मदत केली नाही. आपल्यापेक्षा छोट्या राज्यांनी गरीबांना मदत केली. महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे मदत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही वीज मंडळाचं काम चांगलं चालवलं ते म्हणाले की, राज्यात सरकार विरोधात रोष आहे. कोरोनाच्या काळात जिथे निवडणुका झाल्या तिथं आम्ही जिंकलो.  जनतेला कर्मयोगी आवडतात, बोलघेवडे आवडत नाहीत. महाराष्ट्रात बोलघेवडे, विजेच्या बिलाबाबत बोलतात एक करतात एक, असाही टोला त्यांनी लगावला. वीजबिलाबाबत ते म्हणाले की,  तीन मंत्री घोषणा करतात, आणि पुन्हा वीजमंत्री म्हणतात वापरलेलं आहे ते तरी बिल भरा. विजबिलाबाबत गोड बातमी देणे दूर, वीज कनेक्शन कट करत असल्याचं सोलापुरातील यंत्रमाग धारकांनी सांगितलं, असंही ते म्हणाले.फडणवीस म्हणाले की, वीज बिल चौकशी लावायची लावा. मी खात्रीने सांगतो त्यांच्यापेक्षा आम्ही वीज मंडळाचं काम चांगलं चालवलं. वीज सर्वात कमी पैशाने खरेदी केली. वापर नसताना बिल वसूली करण्यासाठी आम्ही सावकारी प्रवृत्तीचे नाहीत, असंही ते म्हणाले.

मोदींच्या नावाने शंख वाजवायचा काम ते म्हणाले की, अँटिइन्कम्बसीमुळे सरकार पडेल असं बोललं जातं होतं.  त्यावेळी लोक मला सांगत होते, उमेदवार कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, आम्ही मोदींना बघून देत आहोत. आव्हानाचा परिस्थितीत माणसाला जगता यावं यासाठी पॅकेजमधून मोदींनी मदत केली. त्याचा परिणाम म्हणून बिहारमध्ये निवडणुकात विजय मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात अनेक नेते, मुख्यमंत्री केंद्राकडे बोट दखवून, मोदींच्या नावाने शंख वाजवायचा काम करत होते. त्यावेळी  भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन, लोकांसाठी कार्य केले. मोदींनी आत्मनिर्भर पॅकेज देऊन गरीब, मजूर, छोटे उद्योग मदत मिळली पाहिजे म्हणून काम केलं असल्याचंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टीमुळे सोलापुरात पिकांच्या नुकसानसह जमीन खरडून गेली, मोठं नुकसान झालं.  मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही. हे तेच सरकार ज्याच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की, 25 ते 50 हजार मदत मिळाली पाहिजे. सरकार वर्ष पूर्ण करत आहे मात्र सांगण्यासारखं काही नाही. सरकार फक्त स्थगिती दिलेली माहिती देऊ शकेल, असा टोला त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget