एक्स्प्लोर

Ambarnath News : विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, अंबरनाथ येथील घटना

Ambarnath News : पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी अंबरनाथ येथील जांभूळ गावात ही घटना घडली.

Ambarnath News : अंबरनाथ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. 04) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ (Ambarnath) येथील जांभूळ गावात पाण्याच्या टाकीच्या उभारणीचे काम सुरु होते. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. 

विजेचा शॉक लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पंपाचा विजेचा पुरवठा सुरूच राहिल्याने या पंपाचा तीन कामगारांना शॉक (Electric Shock) बसला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुलशन मंडल, राजन मंडल, शालिग्राम मंडल अशी मृत कामगारांची नावे आहेत. 

एक कामगार गंभीर जखमी, दोन बचावले

या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली असून त्यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अकोल्यात जमिनीच्या वादातून एकाची हत्या

जमिनीच्या वादातून एकाची गाढ झोपेत असतानाच लाठीकाठी आणि कुर्हाडीनं वार करून निर्घृणपणे हत्या (Crime) करण्यात आली. ही धक्कादायक घटना अकोला (Akola Crime News) जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या बटवाडी गावात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बटवाडी गावातील सरकारी जागेवरील ताब्यावरुन तीन कुटुंबीयामध्ये वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद  31 मार्चच्या रात्री अचानक उफाळून आला.  कालांतराने हा वाद इतका विकोपाला गेला की, रात्री साडेअकरा पर्यंत शाब्दिक वाद सुरू होता आणि मध्यरात्रीनंतर दुसऱ्या कुटुंबातील काहींनी आखरे कुटुंबातील एकावर प्राणघातक हल्ला करत त्याला संपवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी (Akola Police) तात्काळ घटनास्थाळ गाठत आतापर्यंत दहा लोकांना ताब्यात घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या

माफी मागतो आणि आता तोडीबाज म्हणतो एवढा लाचार माणूस हिंदुस्तानात सापडणार का? बच्चू कडूंचा रवी राणांवर 'प्रहार'!

Anandraj Ambedkar: आनंदराज आंबेडकरांनी वंचितला रोखठोक भाषेत सुनावलं, पाठिंबा धुडकावत अमरावती लोकसभेच्या रिंगणातून माघार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget