एक्स्प्लोर

Coronavirus | उपाशी मुलांच्या काळजीने दोन दिवसांपासून दाम्पत्याची पायपीट

मुलांना कामाच्या ठिकाणी ठेऊन गावाकडे गेलेल्या मोलमजुरी करणाऱ्या पवार दाम्पत्याने दोन दिवसात 50 किमीपेक्षा अधिक प्रवाय पायी केलाय. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने सव्वाशे किलोमीटर ते पायी निघाले आहेत.

उस्मानाबाद : वीटभट्टीवर मोलमजुरी करणारे पवार दाम्पत्य आपल्या दोन मुलांना तेथेच ठेवून गावी गेले होते. गावाकडे आईचे वर्षश्राद्ध उरकून मुलांकडे परतण्यापूर्वीच सगळे काही ठप्प झाले. गाड्या बंद, पोलिसांची धास्ती आणि दुसरीकडे मुलांची काळजी. आठ दिवसांपासून डोळ्याआड असलेल्या मुलांच्या काळजीने दोन वर्षांच्या शिवमला कडेवर घेऊन दोघा नवरा बायकोने पायीच प्रवास केला आहे. उपाशी मुलांच्या काळजीपोटी तुळजापूर तालुक्यातील टाकीतोरंबा ते भूम तालुक्यातील हिवरा अशी तब्बल सव्वाशे किलोमीटरची पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ या दोघांवर आली आहे.

चाळीशी पार केलेले बालाजी पवार भूम तालुक्यातील हिवरा येथे वीटभट्टी कामगार आहेत. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी सविता देखील वीटभट्टीवर काम करते. 19 मार्च रोजी गावाकडे आईचे वर्षश्राद्ध असल्यामुळे दोन वर्षाच्या शुभमला सोबत घेऊन बालाजी पवार गावी आले. अवघ्या दोन दिवसांत परत यायचे असल्याने 10 वर्षीय विशाल आणि त्याहून लहान असलेल्या काजलला वीटभट्टीवरच ठेवले. तुळजापूर तालुक्यातील टाकीतोरंबा येथील घरगुती कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी गावीच त्यांचा मुक्काम पडला आणि सगळे गणित हुकले. 21 मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी लोकडाऊन जाहीर केले. दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यु आणि त्यानंतर पुकारलेल्या संचारबंदीमुळे पवार दाम्पत्य गावातच अडकले. सगळ्या गाड्या बंद असल्याने मुलांकडे परतण्याचे सगळे रस्तेच बंद झाले. त्यात पोलिसांकडून मारहाण होईल या भीतीपोटी गावकऱ्यांनी या दोघांना गावातच थांबवून ठेवले. मुलांच्या काळजीमुळे आईची होत असलेली घालमेल पायी जाण्याच्या निर्णयाप्रत आली. आणि आठ दिवस नजरेआड असलेल्या मुलांची काळजीपोटी या दोघांनी शुक्रवारी रात्री दोन वाजता भूमच्या दिशेने पायपीट सुरू केली.

राज्यात कोरोनाचा आठवा बळी; बुलडाण्यात मृत्यू झालेला पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

दोन दिवसात पन्नास किमीहून अधिक पायपीट हमरस्त्यावर पोलीस मारहाण करतील या भीतीने शेतशिवारातून मार्ग काढीत दोन वर्षांच्या शुभमाला सोबत घेऊन शनिवारी हे दोघे बेंबळी येथे पोहचले. बेंबळीत मुक्काम केला. कोणाला तरी कीव आली दोन भाकरी दिल्या आणि पुढील प्रवास सुरु झाला. रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या आडोश्याला शिल्लक ठेवलेल्या एका भाकरीची तिघे मिळून न्याहरी करीत होते. यावेळी कोरोना नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका मुख्याध्यापकाने कोणतीही चौकशी न करता केवळ त्यांचा फोटो काढला. या दोघांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता. सविता पवार यांना भावना अनावर झाल्या. गाडी का बंद केल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमची मुलं तिकडे उपाशी असतील आम्हाला अडवू नका असे म्हणत हंबरडा फोडला. दोन दिवसात दोन पिशव्या आणि मुलाला कडेवर घेऊन या दोघांनी पन्नासहुन अधिक किलोमीटरचा पल्ला पार केला आहे. त्यांच्या मुक्कामाचे ठिकाण आणखी 70 किलोमीटर दूर आहे. वाटेत त्यांना कोणी रोखले नाही तर आठ दिवसांपासून नजरेआड असलेल्या मुलांची दोन दिवसात भेट होऊ शकेल. अन्यथा ही जीवघेणी घालमेल आणखी किती दिवस चालणार कोणास ठाऊक अश्या शब्दात बालाजी पवार यांनी आपलं मन मोकळं केलं.

Medicine for Corona | हायड्रोक्सीक्लोरिक्विन औषधाने कोरोनाचा संसर्ग प्रभाव घटतो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं अयोग्य - गंगाखेडकर

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray on NEET Exam Paper Leak: ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का? नीट पेपरफुटी प्रकरणावर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले, 'शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत...'
ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का? नीट पेपरफुटी प्रकरणावर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले, 'शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत...'
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Pune Accident: पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
India Weather Forecast : मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?
मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Embed widget