एक्स्प्लोर

उत्साहीपणा दाखवू नका, मंत्री जयंत पाटलांच्या सूचना, रुग्ण वाढल्याने सांगलीत स्वतंत्र समिती

कोरोना व्हायरसचे रुग्ण सांगलीत वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी काही निर्देश दिले आहेत. तसेच सांगलीत एक समिती देखील नेमली आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने समिती नेमली आहे. ही समिती तिथे बसून काम करेल. रुग्ण आढळल्यानंतरही लोक अजून ही गंभीर नाहीत. ज्या भागात कोरोनाबाधित लोक आहेत. तो भाग सोडला तरी लोक बाहेर फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी बाहेर पडू नये. उत्साहीपणा देखील दाखवू नये, अशा सूचना मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता तीन सदस्यीय समिती नेमली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या काळात कोणत्याही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था कोणत्याही हेतूसाठी बाहेर पडू नकाय. तुम्ही काही मदत वाटायला ग्रुपने फिरत आहात. एकत्रित जेवण व्यवस्था तुम्ही करता पण ह्यात गर्दी होते. हे अपेक्षित नाही. आपल्याला कोणाला करोना झाला माहीत नाही. असं असताना घराबाहेर पडू नका. घरात बसून सेवा करा, काहीही मदत करायची असेल तर जिल्हा प्रशासनाला करा. ते व्यवस्था करतील. तुम्ही उत्साहीपणा दाखवून बाहेर पडू नका, असं देखील जयंत पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यात तीन सदस्यीय समिती सांगली जिल्ह्यात येथे कोरोना रुग्ण जास्त आढळल्याने तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जेजे हॉस्पीटलच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. ही तीन सदस्यीय समिती सांगलीमध्येच राहून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. फेसबुक लाईव्हच्या संवादात ते म्हणाले की, कोरोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या लॅबला परवानगी देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. आम्ही त्यांच्याकडे लॅबच्या मागणीसंदर्भात पाठपुरावा करत आहोत. सध्या मुंबईत कोरोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या चारच लॅब आहेत. जास्त ठिकाणी लॅबला परवानगी दिल्यास त्यातूनही कोरोनाचा फैलाव आणखी वाढू शकतो असे केंद्राचे म्हणणे आहे, असं जयंत पाटील म्हणाले. एन-95 मास्कची कमतरता आपल्याकडे आहे. पण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे युद्धपातळीवर हे मास्क उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे मास्क जसे उपलब्ध होतील, तसे गरजेनुसार ते त्या भागात पोहोचवण्यात येतील, असं जयंत पाटील म्हणाले. सांगलीमध्ये 24 वर कोरोनाबाधित सांगलीमधील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सांगली येथे आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.सगळे सांगलीतील करून रुग्णांचा आकडा 24 वर पोहोचला आहे.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सांगलीतील आणखी 25 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल बारा जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. 13 मार्च रोजी सौदी अरेबिया मधून इस्लामपूर येथील चार जण उमराह देवदर्शन यात्रेनंतर परतले होते. त्यानंतर या चौघांना 23 मार्च रोजी कोरोना लागण झाली होती. त्यानंतर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केलं होतं. तरी यामधील पाच जणांना कोरोना लागण झाली होती. बुधवारी(25 मार्च) 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ज्यांचे रिपोर्ट आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून यामधील तब्बल 12 जणांना कोरोना लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 24वर पोहचली आहे. हे सर्व रूग्ण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. यातील 4 जण हे परदेश वारी करून आले होते व त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील व त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget