एक्स्प्लोर

नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं. याप्रकरणी अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. काल आरे येथील जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

नाणार येथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होता. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं. नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मु्ंबईत विधानभवनातून थेट दिल्लीपर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करु, असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. आरे येथील कारशेडला विरोध करत जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतले त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी नाणार येथील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णायाचे नाणारवासियांनी स्वागत केले.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार, मालवणीतील तरुणाला अटक
वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार, मालवणीतील तरुणाला अटक
RBI New Rule For Minors :  रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, मुला-मुलींना वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: बँक खातं उघडता आणि हाताळता येणार
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, मुला-मुलींना वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: बँक खातं उघडता आणि हाताळता येणार
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट, 500 रुपयांचा संभ्रम देखील दूर केला
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
मोठी बातमी! कोब्रा कंमाडोंकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटी बक्षीस असलेला विवेक ठार
मोठी बातमी! कोब्रा कंमाडोंकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटी बक्षीस असलेला विवेक ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Kumbhar Vastav 154 : Puja Khedkar ची अटक का टळली? विजय कुंभार सर्वोच्च न्यायालयात जाणारSpecial Report Raj Thackeray & Ashish Shelar | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत मिठाचा खडा?Special Report  Raj & Uddhav Thackeray | राज-उद्धव खरंच एकत्र येणार? राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?Latur Mahadevwadi | Ground Report |हंडाभर पाण्यासाठी पायपीट,तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार, मालवणीतील तरुणाला अटक
वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार, मालवणीतील तरुणाला अटक
RBI New Rule For Minors :  रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, मुला-मुलींना वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: बँक खातं उघडता आणि हाताळता येणार
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, मुला-मुलींना वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: बँक खातं उघडता आणि हाताळता येणार
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट, 500 रुपयांचा संभ्रम देखील दूर केला
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
मोठी बातमी! कोब्रा कंमाडोंकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटी बक्षीस असलेला विवेक ठार
मोठी बातमी! कोब्रा कंमाडोंकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटी बक्षीस असलेला विवेक ठार
कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे, रत्नागिरीहून महिला थेट संतोष देशमुखांच्या घरी; पोलीसही धावले
कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे, रत्नागिरीहून महिला थेट संतोष देशमुखांच्या घरी; पोलीसही धावले
Crime News: बीडमध्ये चाललंय काय? गेवराईत कुटुंबातील 8 जणांवर कोयता व रॉडने वार, एकाचे डोके फोडले
बीडमध्ये चाललंय काय? गेवराईत कुटुंबातील 8 जणांवर कोयता व रॉडने वार, एकाचे डोके फोडले
Congress मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेला गर्दी जमवता आली नाही; काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांचे निलंबन
मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेला गर्दी जमवता आली नाही; काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांचे निलंबन
Jaykumar Gore : ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले, पण...; जयकुमार गोरेंचा विरोधकांना थेट इशारा
ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणाले, पण...; जयकुमार गोरेंचा विरोधकांना थेट इशारा
Embed widget