एक्स्प्लोर

'शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होणार', बोगस बियाणांच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून बोगस बियाणे विक्री करणारांविरोधात कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून बोगस बियाणे विक्री करणारांविरोधात कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी आहे. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस  बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल. हेही वाचा- CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे ते म्हणाले की, एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. योगायोगाने 1 तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्‍यांना, अन्नदात्याला सलाम करतो, धन्यवाद देतो. परवा 1 तारीख आहे, त्या दिवशी आपल्यासाठी लढणार्‍या सर्व डॉक्टर्स चा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो. बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. या वृत्ताची दखल औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून खंडपीठाने यावर सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.  मराठवाड्यातील  परभणी, नांदेड,,लातूर , हिंगोली आणि  अहमदनगर जिल्ह्यांमध्ये बनावट सोयाबीन बियाणे विक्री झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सोयाबीनची अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच ते विक्री करणारे यांच्या विरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाईचे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे आणि न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत. एबीपी माझाने लागवडीनंतर सोयाबीन उगवण झालीच नसल्याचे वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. प्रकरणात अॅड. पी. पी. मोरे यांची अमायकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) म्हणून नेमणूक करण्यात आली असून याचिकेवर एका आठवड्याने सुनावणी ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. बोगस बियांणाच्या तक्रारी येत आहेत हे दुर्देवी. उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार. मी आषाढी वारीला पूजेसाठी जाणार. विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे. दहिहंडी उत्सव स्वताहून रद्द केला. ही खरी सामाजिक जाणीव. गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका मूर्ती लहान करण्याचा निर्णय कौतुकास्पद प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करणारं देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र असेल कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं लढणं हे आपल्या रक्तात आहे, आता रक्तदान करुन आपला लढाऊपणा सिद्ध करा रेमडेसिवीर आणि अन्य औषधं मोफत उपलब्ध करुन देणार चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे ज्येष्ठ डॉक्टरांनी काळजी घेऊन काम करावं पाऊस आला की नवचैतन्यासोबत काही समस्याही घेऊन येतो, मात्र आपली तयारी सुरु आहे या दिवसात अन्य रोगांचीही भीती आहे, त्यामुळं काळजी घ्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं दार उघडं, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Sudhirdas Pujari on Raj Thackeray: गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...
गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता आम्ही राॅकेट बनवणार की नाही?' इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांसह हजारो कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना लिहिलं पत्र, खासगीकरणावर स्पष्टता देण्याची मागणी
'आता आम्ही राॅकेट बनवणार की नाही?' इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांसह हजारो कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना लिहिलं पत्र, खासगीकरणावर स्पष्टता देण्याची मागणी
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray: मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget