एक्स्प्लोर

Water Crisis : चिंता वाढली! बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद; जिल्ह्यात अवघे काही दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

Buldhana Water Crisis : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Buldhana Water Crisis : विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून तापमानाचा पारा रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच दुसरीकडे राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जलसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना मे महिन्याचा शेवटाला पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि पाच मध्यम जलाशयात पाणीसाठा कमी जमल्याचे निदर्शनात आले होते.

परिणामी, यावर्षी जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी देखील नागरिकांना मोठा संघर्ष करवा लगत असल्याचे चित्र आहे. 

अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

वाढत्या तापमानामुळे बुलढाणा जिल्ह्यातही आता भीषण पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. यात आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात फक्त अकरा टक्के उपयुक्त जलसाठा उरला असून साधारणतः 28 दिवस पुरेल एवढा हा जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही चारा संकट अद्यापही उद्भवलेलं नाही. मात्र आगामी काळात अशीच परिस्थिती अधिक काळ कायम असल्यास ती स्थितीही उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

2023-24 या वर्षात मान्सून मध्ये बुलढाणा जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडला. तर धरणाच्या कॅचमेंट एरियात सुद्धा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्प हे भरलेच नाही. त्यामुळे आता उन्हाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पावसाळा संपला त्यावेळी जिल्ह्यात सरासरी 63 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी हा जलसाठा बाष्पीभवन व इतर कारणांनी घटल्याने सध्या जिल्ह्यात फक्त 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा उरला आहे. 

जिल्ह्यातील फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक 

राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही दिवसेंदिवस पाणीटंचाई संकट हे अधिक गडद  होताना दिसत आहे.  जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पात फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला आहे. हा जलसाठा पुढील 28 दिवस पुरेल एवढाच आहे. मात्र सध्याही जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. आगामी काळात लवकर पावसाळा सुरू झाला नाही तर मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईचा संकट हे मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. सुदैवाने जिल्ह्यात सध्या तरी जनावरांसाठी चारा उपलब्ध असून कुठेही चाऱ्याचे संकट नसल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भौगोलिक दृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग आहे. एक म्हणजे घाटावरील भाग आणि दुसरा म्हणजे घाटाखालील भाग. मात्र, यावर्षी घाटावरील सात तालुक्यात पाणीटंचाईच संकट मोठ झाल आहे. बुलढाणा , चिखली , देऊळगाव राजा , सिंदखेड राजा , लोणार आणि  मेहकर या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे घाटाखालील कुठल्याही तालुक्यात पाणीटंचाईच संकट सध्या तरी नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Language Taxi And Rickshaw Licenses: मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!
मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
Solapur Crime News: चार महिन्यापूर्वी झालं लग्न, पैशाच्या हव्यासापायी नराधम पतीने काढला पत्नीचा काटा, नंतर रचली खोटी कहाणी, पण...; घटनेनं सोलापूर हादरलं!
चार महिन्यापूर्वी झालं लग्न, पैशाच्या हव्यासापायी नराधम पतीने काढला पत्नीचा काटा, नंतर रचली खोटी कहाणी, पण...; घटनेनं सोलापूर हादरलं!

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Gold rate Silver price: सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Embed widget