एक्स्प्लोर

Water Crisis : चिंता वाढली! बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद; जिल्ह्यात अवघे काही दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

Buldhana Water Crisis : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Buldhana Water Crisis : विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून तापमानाचा पारा रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच दुसरीकडे राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जलसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना मे महिन्याचा शेवटाला पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि पाच मध्यम जलाशयात पाणीसाठा कमी जमल्याचे निदर्शनात आले होते.

परिणामी, यावर्षी जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी देखील नागरिकांना मोठा संघर्ष करवा लगत असल्याचे चित्र आहे. 

अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

वाढत्या तापमानामुळे बुलढाणा जिल्ह्यातही आता भीषण पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. यात आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात फक्त अकरा टक्के उपयुक्त जलसाठा उरला असून साधारणतः 28 दिवस पुरेल एवढा हा जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही चारा संकट अद्यापही उद्भवलेलं नाही. मात्र आगामी काळात अशीच परिस्थिती अधिक काळ कायम असल्यास ती स्थितीही उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

2023-24 या वर्षात मान्सून मध्ये बुलढाणा जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडला. तर धरणाच्या कॅचमेंट एरियात सुद्धा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्प हे भरलेच नाही. त्यामुळे आता उन्हाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पावसाळा संपला त्यावेळी जिल्ह्यात सरासरी 63 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी हा जलसाठा बाष्पीभवन व इतर कारणांनी घटल्याने सध्या जिल्ह्यात फक्त 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा उरला आहे. 

जिल्ह्यातील फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक 

राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही दिवसेंदिवस पाणीटंचाई संकट हे अधिक गडद  होताना दिसत आहे.  जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पात फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला आहे. हा जलसाठा पुढील 28 दिवस पुरेल एवढाच आहे. मात्र सध्याही जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. आगामी काळात लवकर पावसाळा सुरू झाला नाही तर मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईचा संकट हे मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. सुदैवाने जिल्ह्यात सध्या तरी जनावरांसाठी चारा उपलब्ध असून कुठेही चाऱ्याचे संकट नसल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भौगोलिक दृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग आहे. एक म्हणजे घाटावरील भाग आणि दुसरा म्हणजे घाटाखालील भाग. मात्र, यावर्षी घाटावरील सात तालुक्यात पाणीटंचाईच संकट मोठ झाल आहे. बुलढाणा , चिखली , देऊळगाव राजा , सिंदखेड राजा , लोणार आणि  मेहकर या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे घाटाखालील कुठल्याही तालुक्यात पाणीटंचाईच संकट सध्या तरी नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget