एक्स्प्लोर

Water Crisis : चिंता वाढली! बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद; जिल्ह्यात अवघे काही दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

Buldhana Water Crisis : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Buldhana Water Crisis : विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून तापमानाचा पारा रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच दुसरीकडे राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जलसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना मे महिन्याचा शेवटाला पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि पाच मध्यम जलाशयात पाणीसाठा कमी जमल्याचे निदर्शनात आले होते.

परिणामी, यावर्षी जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे भीषण सावट निर्माण झाले असताना, आता जिल्ह्यात अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी देखील नागरिकांना मोठा संघर्ष करवा लगत असल्याचे चित्र आहे. 

अवघे 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा शिल्लक

वाढत्या तापमानामुळे बुलढाणा जिल्ह्यातही आता भीषण पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. यात आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात फक्त अकरा टक्के उपयुक्त जलसाठा उरला असून साधारणतः 28 दिवस पुरेल एवढा हा जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही चारा संकट अद्यापही उद्भवलेलं नाही. मात्र आगामी काळात अशीच परिस्थिती अधिक काळ कायम असल्यास ती स्थितीही उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

2023-24 या वर्षात मान्सून मध्ये बुलढाणा जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडला. तर धरणाच्या कॅचमेंट एरियात सुद्धा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्प हे भरलेच नाही. त्यामुळे आता उन्हाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पावसाळा संपला त्यावेळी जिल्ह्यात सरासरी 63 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी हा जलसाठा बाष्पीभवन व इतर कारणांनी घटल्याने सध्या जिल्ह्यात फक्त 28 दिवस पुरेल एवढा जलसाठा उरला आहे. 

जिल्ह्यातील फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक 

राज्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही दिवसेंदिवस पाणीटंचाई संकट हे अधिक गडद  होताना दिसत आहे.  जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पात फक्त 11 टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला आहे. हा जलसाठा पुढील 28 दिवस पुरेल एवढाच आहे. मात्र सध्याही जिल्ह्यातील सात तालुक्यातील 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. आगामी काळात लवकर पावसाळा सुरू झाला नाही तर मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईचा संकट हे मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. सुदैवाने जिल्ह्यात सध्या तरी जनावरांसाठी चारा उपलब्ध असून कुठेही चाऱ्याचे संकट नसल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भौगोलिक दृष्ट्या बुलढाणा जिल्ह्याचे दोन भाग आहे. एक म्हणजे घाटावरील भाग आणि दुसरा म्हणजे घाटाखालील भाग. मात्र, यावर्षी घाटावरील सात तालुक्यात पाणीटंचाईच संकट मोठ झाल आहे. बुलढाणा , चिखली , देऊळगाव राजा , सिंदखेड राजा , लोणार आणि  मेहकर या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे घाटाखालील कुठल्याही तालुक्यात पाणीटंचाईच संकट सध्या तरी नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget