Breaking News LIVE : पुरेशा लस साठ्याअभावी उद्या 4 ऑगस्टला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
Breaking News LIVE Updates, 3 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर; सोमवार ते शनिवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली काल जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.
राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे. उर्वरित जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकान उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यस सेवेची दुकानेच सुरु राहतील. वॉकिंग सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडे राहतील.
आज बारावीचा निकाल; आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार
काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
राज्यात काल 4869 रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात काल 4,869 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे.
राज्यात काल कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (82) वाशिम (89), गोंदिया (97), गडचिरोली (16) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नंदूरबार, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,83,52,467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,15,063 (13.6 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,61,637 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुरेशा लस साठ्याअभावी उद्या 4 ऑगस्टला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
पुरेशा लस साठ्याअभावी उद्या 4 ऑगस्टला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बुधवार दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई
अकलूज ग्रामपंचायत आता अकलूज नगर परिषद होणार
अखेर 43 दिवसाच्या आंदोलनानंतर राज्यातील आघाडी सरकार बधले. अकलूज ग्रामपंचायत आता अकलूज नगर परिषद होणार. शासनाकडून अंतिम नोटिफिकेशन.
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात करणार काम. पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात केला औपचारिक प्रवेश. राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची उपस्थिती. लवकरच मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार विधीवत प्रवेश. या कार्यक्रमात अनेक तमाशा फडमालक करणार राष्ट्रवादीत प्रवेश.
परभणी-आयएएस आंचल गोयल यांनी स्वीकारला पदभार
परभणी-आयएएस आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाने नियुक्ती परत दिल्याने आज पदभार स्वीकारला आहे. विभागीय आयुक्तांना पदभार घेतल्याचे पत्र दिले आहे. मात्र गोयल अद्याप परभणीत दाखल झाल्या नाहीत.
ठाणे जिल्ह्यातील दुकानांना सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजेपर्यंतची परवानगी
ठाणे जिल्ह्यातील दुकानांना सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजेपर्यंतची परवानगी, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सोमवार ते शनिवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु, ठाणे जिल्ह्यातील मॉल्स पूर्णपणे बंदच
वीरमरण आलेल्या जवान कैलास पवार यांच्यावर 4 ऑगस्टला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील व युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फुट आहे. मात्र, 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट वरून लिंक सोबत परत येत असताना अचानक मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येवून ते खाली पडले. त्यांना जबर मार लागल्यामुळे गतप्राण होवून शहीद झाले. द्रास सेक्टर जगामध्ये अति कमी तापमान असलेले ठिकाण असून येथे वजा 10 ते 20 डिग्री से. तापमान असते. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असल्यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यूच्या घटना घडतात.
पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड, गणेश गायकवाडसह पाच जणांवर मोक्का
पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड, गणेश गायकवाडसह पाच जणांवर मोक्का लावण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारात यांचा समावेश करत, अशी कारवाई केलीये. गणेश गायकवाडवर अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महिलेने दाखल केला होता. यात सासरे नाना गायकवाडसह अन्य आरोपींचा समावेश होता. त्यासह एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुरशृंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. गणेश गायकवाड आणि त्यांचे वडील नाना गायकवाड यांना गणेश साठे, राजू अंकुश आणि दीपक गवारे यांची साथ लाभते. ही टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
येवला तालुक्यातील धुळगाव येथील एका व्यक्तीची कोटमगाव जवळील उड्डाणपूल जवळ रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या
येवला तालुक्यातील धुळगाव येथील एका व्यक्तीने कोटमगाव जवळील उड्डाणपूल जवळ रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. धुळगाव येथील भाऊसाहेब उर्फ वाल्मीक रत्नाकर गायकवाड (वय 38) याने मनमाड दौंड अपलाईन वरील मालगाडी खाली दुपारच्या सुमारास स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला. दरम्यान ही आत्महत्या कोणत्या कारणासाठी झाली आहे याचा पोलीस कसून तपास करत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली
अहमदनगर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाईची विशेष मोहीम राबवली. जिल्ह्यात नगर तालुक्यासह, भिंगार, श्रीरामपूर, राहुरी आणि शेवगाव तालुक्यात 9 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू, देशी दारू, कच्चे रसायन, भट्टीची साधने, नवसागर असा तब्बल 5 लाख 1 हजार 960 रूपायांचा मुद्देमाल पोलिसांनी जावोत केलाय. दरम्यान या प्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99.53 टक्के
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल 99.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets