![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bhagat Singh Koshyari Controversy : महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा; संभाजीराजेंची मागणी
Bhagat Singh Koshyari Controversy : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, असे ट्विट संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केले आहे.
![Bhagat Singh Koshyari Controversy : महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा; संभाजीराजेंची मागणी Bhagat Singh Koshyari Controversy A person who is aware of the traditions of Maharashtra should be appointed as the Governor SambhajiRaje demand to pm modi Bhagat Singh Koshyari Controversy : महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा; संभाजीराजेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/30/bb30d0fd8f87688bd5c550d3fe9c2ee51659180826_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhagat Singh Koshyari Controversy : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी ट्विट करत कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची आणि याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.
भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करत कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. संभाजीराजे यांनी देखील ट्विट करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. शिवाय महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
"विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो, अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
'राष्ट्रपती द्रौपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान @narendramodi जी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा. @rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 30, 2022
महत्वाच्या बातम्या
Bhagat Singh Koshyari Controversy LIVE: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद, पाहा प्रत्येक अपडेट
राज्यपालांच्या वक्तव्यावर गुजराती-राजस्थानी व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं? त्यांचे योगदान काय? इतिहास काय सांगतो?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)