एक्स्प्लोर

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 मॅच हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे होणार आहे. या मॅचपूर्वी तिलक वर्मानं पत्रकारांसोबत संवाद साधला.

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथे रविवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा फलंदाज तिलक वर्मानं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यानं संघ व्यवस्थापनाच्या फलंदाजी क्रमातील लवचिकतेच्या धोरणाचं समर्थन केलं. संघातील बहुतांश फलंदाज मॅचमधील परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार असल्याचं तिलक वर्मा म्हणाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.

Tilak Varma : तिलक वर्मा काय म्हणाला?

भारतानं आगामी टी 20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून मधल्या फळीत फलंदाजी क्रमातील प्रयोग सुरु ठेवले आहेत. मर्यादित सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये तुम्ही गोष्टी स्वीकारणं महत्त्वाचं असतं, असं तिलक वर्मा म्हणाला. दोन्ही सलामीवीर सोडून प्रत्येक जण फलंदाजी क्रमाबाबत लवचिक आहे. मी 3,4,5,6, किंवा टीम ज्या फलंदाजी क्रमाला प्राधान्य देईल त्या स्थानावर फलदाजी करण्यास तयार आहे, असं तिलक वर्मानं म्हटलं. टीमला वाटलं की हा पर्याय बेस्ट असेल तर प्रत्येक जण टीमच्या भूमिकेबरोबर असतो, असं तिलक वर्मा म्हणाला.

तिलक वर्मानं काही निर्णय हे परिस्थिती पाहून घेतलेले असतात जे भूमिका आधारित नसतात. अक्षर पटेल यानं तिसऱ्या स्थानावर चांगली फलंदाजी केलेली आहे. ते परिस्थितीवर अवलंबून असतं. यासाठी तिलक वर्मानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये काही प्रयोग यशस्वी ठरल्याचं देखील सांगितलं.

धर्मशालामधील स्थितीबाबत बोलताना तिलक वर्मा म्हणाला की थंड वातावरण असलं तरी खेळपट्टी फलंदाजीसाठी फायदेशीर ठरेल. या ठिकाणी अंडर 19 मालिका भारताकडून खेळल्याचं तिलक वर्मानं सांगितलं. आम्ही खेळपट्टी पाहिली असून मॅच हाय स्कोरिंग असेल, असंही तो म्हणाला. कमी तापमानामुळं थोडी मदत गोलंदाजांना सुरुवातीला मिळेल, असंही तिलक वर्मा म्हणाला.

भारतीय संघ मानसिकदृष्ट्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे. नाणेफेक आमच्या हातात नाही. आम्ही दव पडेल त्याच्या परिणामासाठी सज्ज आहोत, ओल्या बॉलनं सराव केल्याचं देखील तिलक वर्मानं सांगितलं. मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. इथं खूप थंडी असली तरी आम्ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्टाय सज्ज असल्याचं तिलक वर्मानं म्हटलं. जे मानसिकदृष्ट्या भक्कम असतात ते कुठेही यश मिळवू शकतात.

तिलक वर्मानं फलंदाजीतील क्रमातील बदलाचा मॅचच्या तयारीवर परिणाम होत नसल्याचं म्हटलं. सरावसत्रात आम्ही बेसिक्स फॉलो करतो. टीमसाठी काय करता येईल हा नेहमी विचार करतो, असं वर्मानं म्हटलं. पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा फलंदाजी करणं फारसं परिणामकारक ठरत नाही. पहिल्या दोन मॅचमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारे संग जिकंले कारण थंडीमुळं सीम आणि स्विंग होता. तिलक वर्मानं आक्रमक रणनीतीवर कायम राहणार असल्याचं सांगितलं. गेल्या 15-20 मॅचमध्ये ज्या इंटेंटनं खेळलो होतो त्यानुसार खेळणार आहोत. आम्हीच टी 20 मालिका जिंकू, असा विश्वास तिलक वर्मानं व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget