एक्स्प्लोर

आम्ही समाधानी! कर्जमाफीची तारीख मिळाली, सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. यावर समाधानी असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu : 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu )  यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आज शेतकीर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका काय आहे? शेतकरीनेते समाधानी आहेत का? या निर्णयानंतर बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का? याबाबतची माहिती पाहुयात. सातबारा कोरा करावाच लागेल, सातबारा कोरा होणारच असे कडू म्हणाले. 

आम्ही तारखेसाठीच आलो होतो आम्ही समाधानी : बच्चू कडू

आज बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, रविकांत तुपकर यांच्यासह काही शेतकऱी नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक झाली. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाली. यामध्ये 30 जूनच्या आत कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला सरकारनं योग्य वेळ आणि तारीख दिली आहे. आम्ही तारखेसाठीच आलो होतो. आम्ही समाधानी असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाळणार असल्याचं सांगितलं

30 जून च्या आता कर्जमुक्ती करु असा शब्द सरकारने आम्हाला दिला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. आम्ही तारखेसाठीच आलो होतो ती तारीख आम्हाला मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे की, आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत असे कडू म्हणाले. सरकारनं योग्य वेळ दिली आहे. आता तरी आम्ही समाधानी आोहत. मेंढपाळाच्या बाबतीत त्यांनी जागा देण्याचे कबूल केलं आहे. सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल असे कडू म्हणाले.  

 बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का?

या निर्णयानंतर बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना कडूब म्हणाले. बाकीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करुन आम्ही याबबतचा निर्णय घेऊ असे कडू म्हणाले. या आंदोलनाचा मी जरी चेहरा असलो तरी या आंदोलनात राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, रविकांत तुपकर, वामनराव चटप यांचे योगदान असल्याचे कडू महणाले. मी यातील एक लहान कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. शेतकरी नेते मोठ्या मनानं या आंदोलनात सहभागी झाले आहेत असे कडू म्हणाले. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की, तूर्तास तरी आंदोलनाचा गरज नाही. आम्हाला जर गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढं खुळं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. अनेक लहान मोठ्या संघटनांनी, मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला होता, त्यांचे सर्वाचे आभार, सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे आभार असे कडू म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच आश्वासन, बैठकीत नेमकं काय-काय ठरलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Embed widget