एक्स्प्लोर

राज्यातील 'या' पाच पोलीस ठाण्यांचा केंद्राकडून सन्मान, गृहमंत्री वळसे पाटलांनी केलं कौतुक

महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच पोलीस ठाण्यांचा केंद्र सरकारकडून सन्मान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Maharashtra police station : राज्यातील पाच पोलीस ठाण्यांचा केंद्र सरकारकडून सन्मान करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलातील उत्कृष्ट काम करणाऱ्या, गुन्हेगारीला प्रतिबंध करणाऱ्या सर्वोकृष्ट पाच पोलीस ठाण्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या (Union Home Ministry) वतीने पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार मिळालेल्या पाचही पोलीस ठाण्यांचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारांमुळे आता इतर पोलीस ठाण्यांनाही केंद्राच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल असे वळसे पाटील म्हणाले.

या पाच पोलीस ठाण्यांना पुरस्कार
पुरस्कार मिळालेल्या पोलीस ठाण्यांमध्ये वाळुंज पोलीस ठाणे (औरंगाबाद शहर), बाभुळगाव पोलीस ठाणे (यवतमाळ), सेवली पोलीस ठाणे (जालना), जोडभावी पोलीस ठाणे (सोलापूर) आणि राजूर पोलीस ठाणे (अहमदनगर) या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सर्व पोलीस ठाण्यांचे वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. उत्कृष्टपणे काम, गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याबरोबरच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहीत करण्यासाठी राज्य पातळीवर पाच सर्वोकृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली.  

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलिसांचा पुरस्कार दिला जातो. राज्यस्तरीय पुरस्कारामुळे आता इतर पोलीस ठाण्यांनाही केंद्राच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget