एक्स्प्लोर

अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजीचा सूर

सरकार स्थापन करत असताना दिल्लीत बैठका झाल्या. त्यात तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यावर फक्त शिवसेनेनेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सह्या केल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. संविधानाच्या उद्देशिकेबाहेर काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधी यांनी सांगितल्याचं अशोक चव्हाण नांदेडमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर माफी मागितली. आता अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने नाराजी निर्माण झाली आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना भेटलो, ते म्हणाले, आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालवणार कसं? मी मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारच्या बाहेर पडायचं. एवढ्या कडक सूचना आम्हाला सरकार बनवण्यापूर्वी देण्यात आल्या. जे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं, ते म्हणाले, काही हरकत नाही आणि त्याच्याबाहेर जाणार नाही. घटना हीच शिवधार्य मानून, घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार आहे, अशाप्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली."

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकीची : नवाब मलिक

अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले. " सरकार स्थापन करत असताना दिल्लीत बैठका झाल्या. त्यात तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यावर फक्त शिवसेनेनेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सह्या केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोणताही लेखी करार नाही : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 

अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'शिवसेनेनं असं काहीही लिहून दिलेलं नाही.  संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी एकत्र आलो : अशोक चव्हाण

घडलेल्या सर्व प्रकरणानंतर अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर दिवसभर टीका झाल्यानंतर संध्याकाळी एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, 'आमची भूमिका जी आहे तिच आहे. ज्यावेळी तीन पक्षांचं सरकार गठीत झालं, त्यावेळी आम्ही एक कॉमन मिनियम प्रोग्राम तयार केला होता. त्यावेळी तिनही पक्षाच्या नेत्यांनी त्यावर संमती दर्शवली होती. त्याप्रमाणे सरकार चाललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, यामध्ये काहीच चुकीचं नाही. तसेच आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे तत्त्वांनुसार काम व्हावं हिच आमची अपेक्षा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Bribe News: मोठी बातमी : पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याचं लाचकांड, तब्बल 28 लाखांची लाच स्वीकारताना पकडलं रंगेहाथ, पोलीस दलात खळबळ
पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याचं लाचकांड, तब्बल 28 लाखांची लाच स्वीकारताना पकडलं रंगेहाथ, पोलीस दलात खळबळ
Rohit Pawar on Pune Bhor Crime news: राज्यात दिवसाला 24 अत्याचार, तासाला एक, रोहित पवारांनी मांडली हादरवणारी आकडेवारी; भोर तालुक्यातील घटनेवरून सरकारकडे मोठी मागणी
राज्यात दिवसाला 24 अत्याचार, तासाला एक, रोहित पवारांनी मांडली हादरवणारी आकडेवारी; भोर तालुक्यातील घटनेवरून सरकारकडे मोठी मागणी
Mumbai BJP News :....तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा नगरसेवकांना सज्जड दम, महापालिकेतील अनुपस्थितीवरून सुनावलं!
....तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना सज्जड दम, महापालिकेतील अनुपस्थितीवरून सुनावलं!
Sanjay Jadhav: मोठी बातमी: खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'त्या' विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, 'सध्याची परिस्थिती...'
खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'त्या' विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, 'सध्याची परिस्थिती...'

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Nasrapur : सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Gokul Election: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Video: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
Pune Bhor Crime news: आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Embed widget