एक्स्प्लोर

अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजीचा सूर

सरकार स्थापन करत असताना दिल्लीत बैठका झाल्या. त्यात तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यावर फक्त शिवसेनेनेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सह्या केल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. संविधानाच्या उद्देशिकेबाहेर काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधी यांनी सांगितल्याचं अशोक चव्हाण नांदेडमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर माफी मागितली. आता अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने नाराजी निर्माण झाली आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना भेटलो, ते म्हणाले, आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालवणार कसं? मी मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारच्या बाहेर पडायचं. एवढ्या कडक सूचना आम्हाला सरकार बनवण्यापूर्वी देण्यात आल्या. जे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं, ते म्हणाले, काही हरकत नाही आणि त्याच्याबाहेर जाणार नाही. घटना हीच शिवधार्य मानून, घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार आहे, अशाप्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली."

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकीची : नवाब मलिक

अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले. " सरकार स्थापन करत असताना दिल्लीत बैठका झाल्या. त्यात तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यावर फक्त शिवसेनेनेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सह्या केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोणताही लेखी करार नाही : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 

अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'शिवसेनेनं असं काहीही लिहून दिलेलं नाही.  संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी एकत्र आलो : अशोक चव्हाण

घडलेल्या सर्व प्रकरणानंतर अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर दिवसभर टीका झाल्यानंतर संध्याकाळी एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, 'आमची भूमिका जी आहे तिच आहे. ज्यावेळी तीन पक्षांचं सरकार गठीत झालं, त्यावेळी आम्ही एक कॉमन मिनियम प्रोग्राम तयार केला होता. त्यावेळी तिनही पक्षाच्या नेत्यांनी त्यावर संमती दर्शवली होती. त्याप्रमाणे सरकार चाललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, यामध्ये काहीच चुकीचं नाही. तसेच आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे तत्त्वांनुसार काम व्हावं हिच आमची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget