एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Uttar Pradesh: मैत्री म्हणावं की आणखी काही? मित्राच्या मृत्यूनंतर त्यानेही घेतली जळत्या चितेवर उडी; गावावर शोककळा

UP News: बालपणीच्या मित्राच्या मृत्यूमुळे दु:ख अनावर होऊन व्यथित झालेल्या व्यक्तीने मित्राच्याच जळत्या चितेत उडी मारुन आपलं जीवन संपवलं. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे.

Uttar Pradesh: प्रत्येकाच्याच आयुष्यात मैत्रीला (Friendship) महत्त्वाचं स्थान असतं. रक्ताचं नातं नसलं तरी ते आयुष्यभर सोबत राहतं. प्रत्येकजण आपल्या मित्रासाठी काहीही करायला तयार असतो. निःस्वार्थी मैत्रीच्या नात्यासाठी अनेक जण आपला प्राण देखील द्यायला तयार होतात आणि असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील (UP News) फिरोजाबादमध्ये पाहायला मिळाला. मित्राच्या मृत्यूनंतर दुःख सहन न झाल्याने एका व्यक्तीने मित्राच्याच चितेत (Funeral) उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.

फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावातील ही घटना आहे. आपल्या बालपणीच्या मित्राच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीने शनिवारी यमुनेच्या काठावर अंत्यसंस्कार पार पडत असताना आपल्या मित्राच्या जळत्या चितेत उडी घेतली. लोकांना समजेपर्यंत तो 95 टक्के भाजला होता आणि नंतर आग्रा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिथेच त्याचा मृत्यू झाला.

फिरोजाबादचे एसपी कुमार रणविजय सिंह यांनी रविवारी सांगितलं की, अशोक कुमार लोधी (वय 44) फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावातील रहिवासी होते. काही महिन्यांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी शेजारील गाडिया पंचवटी गावातील त्यांचे मित्र आनंद गौरव राजपूत (वय 42) तेथे उपस्थित होते. बालपणापासूनची मैत्री संपुष्टात आली तेव्हा आनंदला हा धक्का सहन झाला नाही. अशोकची चिता जळत असताना आनंदने त्यात उडी घेतली.

एसपी पुढे म्हणाले की, जेव्हा लोक अंत्यसंस्कार करुन चिता पेटवून घरी परतत होते, तेव्हाही आनंद तिथेच बसून रडत राहिला. 'दोस्त में आता हूं' असं ओरडून आनंद राजपूतने अचानक पेटत्या चितेत उडी घेतली. जळत्या चितेत उडी घेतल्यामुळे आनंद 95 टक्के भाजला गेला, त्याला बाहेर काढेपर्यंत त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आनंद राजपूत यांचा मोठा भाऊ कमल यांनी सांगितलं की, दोघांमध्ये लहानपणापासून घट्ट मैत्री होती आणि आनंदला मित्राचा मृत्यू सहन झाला नाही. दोघेही एकाच शाळेत गेले आणि दोघांनी एकाच दिवशी लग्नही केले. अशोक लोधी एक निष्णात ढोलकी वादक होता, तर माझा भाऊ त्याच्यासोबत झांज वाजवत असे. त्यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संगीत वाजवायला बोलावले जायचे आणि त्या दोघांची जोडी देखील लोकप्रिय असल्याचं ते म्हणाले.

या दोघांची मैत्री गावात चांगलीच गाजली होती. ते दोघे शेतात तासनतास गाणी गाण्यात घालवायचे आणि अनेकदा एकत्र जेवण करायचे. दोघेही स्वभावाने धार्मिक आणि विनम्र होते, असं गावकऱ्यांनी सांगितलं.

अशोक लोधी याला काही महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पाच मुलींचे वडील असलेल्या आनंद राजपूत याने अशोकच्या वैद्यकीय खर्चात हातभार लावला. अशोकनेही मित्राच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च केला होता.

अशोक लोधी यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. अशोक आणि आनंद या दोघांचीही मुलं एकाच शाळेत शिकतात.

या घटनेला एसएचओ महेश सिंह यांनी आत्महत्या करून मृत्यूचं प्रकरण म्हटलं आहे आणि त्यामुळे याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही.

हेही वाचा:

Cheapest Electricity: 'या' देशात लोकांचं वीज बिल येतं मायनसमध्ये; सरकारही चिंतेत! जाणून घ्या त्यामागचं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Dairy Milk : उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना खास ‘LOVE YOU’ लिहिलेलं चॉकलेटUdayanraje - Shivendraraje: विजयानंतर साताऱ्यात राजेंची भेट, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना गोड पापाZero Hour With Sarita Kaushik : सरकारमधून बाहेर पडण्याची फडणवीसांनी दुसऱ्यांदा व्यक्त केली इच्छाZero Hour Guest Center : फडणवीसांची कार्यकर्त्यांना गरज, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये : लोढा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं
माझ्या लेकाचं बरंवाईट व्हावं यासाठी त्यांनी मोठ-मोठ्या पूजा घातल्या, लाखोंचा खर्च; निलेश लंकेंच्या आईकडून सुजय विखेंवर गंभीर आरोप
माझ्या लेकाचं बरंवाईट व्हावं यासाठी त्यांनी मोठ-मोठ्या पूजा घातल्या, लाखोंचा खर्च; निलेश लंकेंच्या आईकडून सुजय विखेंवर गंभीर आरोप
''दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर''; शरद पवारांनी फोनवरुन लंकेंना सांगितलं, राजकीय उलथापालथ होणार का?
''दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर''; शरद पवारांनी फोनवरुन लंकेंना सांगितलं, राजकीय उलथापालथ होणार का?
Narendra Modi : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे NDA ला समर्थन, नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे NDA ला समर्थन, नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
Embed widget