एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Coronavirus | जनता कर्फ्यू : 22 मार्चला 3500 हून अधिक लोकलपासून एक्सप्रेसपर्यंत विविध रेल्वे गाड्या रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 मार्चला देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती केली आहे. यादिवशी साडेतीन हजारपेक्षा जास्त लोकलपासून एक्सप्रेसपर्यंत विविध रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी 22 मार्चला देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दिवशी देशभरात साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यात लोकल, पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. सोबतच यावेळेत लोकल आणि ट्रेन देखील अतिशय कमी प्रमाणात चालवण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश आहे. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्चला देशातील सर्व नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याची विनंती केली आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मोदींनी केली. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे. #JantaCurfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा देशभरात साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे रद्द जनता कर्फ्युच्या वेळी लोकल आणि इतर ट्रेन देखील अतिशय कमी प्रमाणात चालवण्याचा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. यावेळी लोकलच्या सर्व्हिस देखील अतिशय कमी मिळणार असल्याचे सांगण्यात आलंय. तर एक्सप्रेस गाड्या मोठ्या प्रमाणात कॅन्सल करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिलेत. 22 मार्चला देशभरात 2400 पेसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तर, 1300 मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस देखील याकाळात धावणार नाही. 22 तारखेला सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत सुरू होणाऱ्या सर्व गाड्या असणार बंद राहणार असल्याची माहिती बोर्डाने दिली. त्यामुळे मुंबईहुन पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा शहरांना जोडणाऱ्या इंटरसिटी गाड्या धावणार नाहीत. सोबत पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्या असणार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जे प्रवासी आधीच निघून प्रवासात आहेत, त्यांना स्टेशनवर थांबण्यास परवानगी आणि सुविधा देण्यात येणार आहे. ज्यांच्या तिकीट कॅन्सल होणार आहेत अशांना रिफंड मिळणार आहे. तर मोठ्या स्टेशनवर परिस्थिती बिकट वाटली तर स्पेशल ट्रेन चालवून गर्दी कमी करण्याची मुभा देखील असणार आहे. Coronavirus | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खाकी वर्दीची भावनिक साद जनता कर्फ्यूवेळी करायचं काय? रविवारी, 22 मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल असे मोदी म्हणाले. हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत. व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून 22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असं मोदी म्हणाले. #JantaCurfew | रविवारी देशभरात जमता कर्फ्यू; देशवासियांना काय वाटतं?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Assembly Election Results 2026: पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा A टू Z माहिती
पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा A टू Z माहिती
West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी
West Bengal Live Updates: पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी
Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण? 
Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण? 
West Bengal : बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
Maharashtra Live blog updates: जळगावमध्ये उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 45 अंशांवर
Maharashtra Live blog updates: जळगावमध्ये उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 45 अंशांवर
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Embed widget