एक्स्प्लोर

Pulwama terror attack : सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात कट रचला

दहशतवाद्यांनी खेळलेल्या रक्तरंजित खेळाचे तीन महत्त्वाचे सूत्रधार होते. मसूद अजहर, राशिद गाजी आणि आदिल अहमद दार उर्फ वकास हे तिघे. पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयात हा कट रचण्यात आला होता.

नवी दिल्ली : पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा कट पाकिस्तानात सहा महिन्यांपूर्वीच शिजल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयात हा कट रचण्यात आला होता. दहशतवाद्यांनी खेळलेल्या रक्तरंजित खेळाचे तीन महत्त्वाचे सूत्रधार होते. मसूद अजहर, राशिद गाजी आणि आदिल अहमद दार उर्फ वकास हे तिघे. विशेष म्हणजे काश्मिरातील दहशतवादी संघटनांनाही या कटाची कानोकान खबर लागू दिली नव्हती. बुरहान वानी या दहशतवाद्याला तीन वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी ठार केलं होतं. त्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर जम्मू आणि श्रीनगरमधील तरुण मोठ्या प्रमाणावर दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले होते. आदिल दार हा गेल्या वर्षी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी होता. VIDEO | भारतावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदची कहाणी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा आदिल अहमद या हल्ल्यात असलेला मानवी बॉम्ब अर्थात आत्मघातकी हल्लेखोर होता. त्याला गेल्या वर्षभरापासून मानसिकदृष्ट्या तयार करण्यात आलं होतं. आदिल प्रशिक्षणासाठी पाकिस्तानलाही गेला होता. त्याचा हँडलर 9 फेब्रुवारीला आपल्या दोन साथीदारांसोबत भारतात आला होता. दक्षिण काश्मिरमध्ये हे सर्व जण लपून बसले होते. दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मदने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा इतिहासातील सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिलं मोठं पाऊल उचललं आहे. व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Embed widget