एक्स्प्लोर

भारताला बुलेट ट्रेनची नाही, आधुनिक, सुरक्षित रेल्वेची गरज : श्रीधरन

एका मुलाखतीत श्रीधरन यांनी बुलेट ट्रेनबाबत आपलं मत मांडलं. बुलेट ट्रेनचा प्रवास प्रचंड महागडा आहे, असं ते म्हणाले.

नवी दिल्ली : ''बुलेट ट्रेन ही श्रीमतांच्या प्रवासाचं साधन असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बुलेट ट्रेन असलेल्या देशांच्या तुलनेत भारत अजून 20 वर्षे मागे आहे. भारतीयांना आधुनिक, सुरक्षित आणि तीव्र रेल्वे व्यवस्थेची जास्त गरज आहे,'' असं देशाचे मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले इलात्तुवपिल श्रीधरन यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत श्रीधरन यांनी बुलेट ट्रेनबाबत आपलं मत मांडलं. बुलेट ट्रेनचा प्रवास प्रचंड महागडा आहे, असं ते म्हणाले. श्रीधरन देशातील अनेक मेट्रो प्रकल्पांचे सल्लागार इंजिनिअरही आहेत. भारतीय रेल्वेने बायो-टॉयलेट, वेग आणि स्वच्छतेच्या बाबतती प्रगती केली असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. बायो-टॉयलेटशिवाय भारतात कोणतीही तांत्रिक प्रगती झालेली नाही. वास्तव हे आहे, की अनेक प्रसिद्ध ट्रेनचा सरासरी वेगही कमी झाला आहे. समयबद्धता कमी झाली आहे. अधिकृतपणे 70 टक्के ट्रेन वेळेवर धावतात असा दावा केला जातो. मात्र वास्तवात केवळ 50 टक्के ट्रेनच वेळेवर धावतात, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, रेल्वे दुर्घटनांच्या बाबतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं श्रीधरन म्हणाले. याउलट ट्रॅक आणि रेल्वे क्रॉसिंगवर जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. दरवर्षी 20 हजार लोकांचा रेल्वे ट्रॅकवर मृत्यू होतो. भारतीय रेल्वे प्रगत देशांच्या बाबतीत 20 वर्षांनी मागे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोण आहेत श्रीधरन? ई श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखलं जातं. देशातील रेल्वेच्या अनेक मोठ्या प्रकल्पांचं श्रेय त्यांना जातं. ते 1995 ते 2012 या काळात दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असतानाच त्यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली दिल्ली मेट्रो आणि त्यापूर्वी कोकण रेल्वे चालू करण्यात आली. भारत सरकारकडून श्रीधरन यांना 2001 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर 2008 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. शिवाय 2005 साली फ्रान्स सरकारकडूनही त्यांना सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. टाइम मासिकाने त्यांचा आशियातील हिरो असा उल्लेख केला होता. संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी सध्या त्यांची नियुक्ती यूएनच्या शाश्वत वाहतुकीसाठी असलेल्या उच्चस्तरीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी केली आहे. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वातील मुख्य रेल्वे प्रकल्प 1970 साली देशातील पहिला मेट्रो प्रकल्प असलेल्या कोलकाता मेट्रोचं काम त्यांनी हाती घेतलं. त्यांच्याच कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण झाला. कोची शिपयार्डमध्ये पहिलं जहाज श्रीधरन यांच्याच नेतृत्त्वात बांधण्यात आलं. 1990 साली निवृत्तीनंतरही त्यांची कोकण रेल्वेचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशातील सर्वात कठीण मानला जाणारा कोकण रेल्वेचा प्रकल्प त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला. दिल्ली मेट्रोचं श्रेय श्रीधरन यांनाच जातं. कोची मेट्रो सुरु करण्यामध्येही श्रीधरन यांचा मोलाचा वाटा आहे. लखनौ मेट्रोचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
Embed widget