एक्स्प्लोर

भारताला बुलेट ट्रेनची नाही, आधुनिक, सुरक्षित रेल्वेची गरज : श्रीधरन

एका मुलाखतीत श्रीधरन यांनी बुलेट ट्रेनबाबत आपलं मत मांडलं. बुलेट ट्रेनचा प्रवास प्रचंड महागडा आहे, असं ते म्हणाले.

नवी दिल्ली : ''बुलेट ट्रेन ही श्रीमतांच्या प्रवासाचं साधन असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बुलेट ट्रेन असलेल्या देशांच्या तुलनेत भारत अजून 20 वर्षे मागे आहे. भारतीयांना आधुनिक, सुरक्षित आणि तीव्र रेल्वे व्यवस्थेची जास्त गरज आहे,'' असं देशाचे मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले इलात्तुवपिल श्रीधरन यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत श्रीधरन यांनी बुलेट ट्रेनबाबत आपलं मत मांडलं. बुलेट ट्रेनचा प्रवास प्रचंड महागडा आहे, असं ते म्हणाले. श्रीधरन देशातील अनेक मेट्रो प्रकल्पांचे सल्लागार इंजिनिअरही आहेत. भारतीय रेल्वेने बायो-टॉयलेट, वेग आणि स्वच्छतेच्या बाबतती प्रगती केली असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. बायो-टॉयलेटशिवाय भारतात कोणतीही तांत्रिक प्रगती झालेली नाही. वास्तव हे आहे, की अनेक प्रसिद्ध ट्रेनचा सरासरी वेगही कमी झाला आहे. समयबद्धता कमी झाली आहे. अधिकृतपणे 70 टक्के ट्रेन वेळेवर धावतात असा दावा केला जातो. मात्र वास्तवात केवळ 50 टक्के ट्रेनच वेळेवर धावतात, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, रेल्वे दुर्घटनांच्या बाबतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं श्रीधरन म्हणाले. याउलट ट्रॅक आणि रेल्वे क्रॉसिंगवर जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. दरवर्षी 20 हजार लोकांचा रेल्वे ट्रॅकवर मृत्यू होतो. भारतीय रेल्वे प्रगत देशांच्या बाबतीत 20 वर्षांनी मागे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोण आहेत श्रीधरन? ई श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखलं जातं. देशातील रेल्वेच्या अनेक मोठ्या प्रकल्पांचं श्रेय त्यांना जातं. ते 1995 ते 2012 या काळात दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असतानाच त्यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली दिल्ली मेट्रो आणि त्यापूर्वी कोकण रेल्वे चालू करण्यात आली. भारत सरकारकडून श्रीधरन यांना 2001 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर 2008 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. शिवाय 2005 साली फ्रान्स सरकारकडूनही त्यांना सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. टाइम मासिकाने त्यांचा आशियातील हिरो असा उल्लेख केला होता. संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी सध्या त्यांची नियुक्ती यूएनच्या शाश्वत वाहतुकीसाठी असलेल्या उच्चस्तरीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी केली आहे. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वातील मुख्य रेल्वे प्रकल्प 1970 साली देशातील पहिला मेट्रो प्रकल्प असलेल्या कोलकाता मेट्रोचं काम त्यांनी हाती घेतलं. त्यांच्याच कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण झाला. कोची शिपयार्डमध्ये पहिलं जहाज श्रीधरन यांच्याच नेतृत्त्वात बांधण्यात आलं. 1990 साली निवृत्तीनंतरही त्यांची कोकण रेल्वेचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशातील सर्वात कठीण मानला जाणारा कोकण रेल्वेचा प्रकल्प त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला. दिल्ली मेट्रोचं श्रेय श्रीधरन यांनाच जातं. कोची मेट्रो सुरु करण्यामध्येही श्रीधरन यांचा मोलाचा वाटा आहे. लखनौ मेट्रोचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Marco Rubio India Visit: 'भारताला आवश्यक असेल तेवढे इंधन पुरवण्यासाठी आम्ही तयार', भारत भेटीपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओंचं मोठा विधान, म्हणाले...
'भारताला आवश्यक असेल तेवढे इंधन पुरवण्यासाठी आम्ही तयार', भारत भेटीपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओंचं मोठा विधान, म्हणाले...
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने सगळे रेकॉर्ड्स मोडले; इतिहासात पहिल्यांदाच घडलं, ध्रुव राठीलाही ओव्हरटेक
कॉकरोच जनता पार्टीने सगळे रेकॉर्ड्स मोडले; इतिहासात पहिल्यांदाच घडलं, ध्रुव राठीलाही ओव्हरटेक

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Manoj Jarange Patil on Prasad Lad: जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
Mumbai Metro Aqua Line: मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Embed widget