एक्स्प्लोर

High Court : नवऱ्याने दुसऱ्या महिलेसह राहणे चुकीचे नाही; दिल्ली हायकोर्टाने असा निकाल का दिला?

Court On Divorce Case : दुसऱ्या महिलेसोबत पतीने राहणे हे चुकीचे नसून पत्नीवर क्रूरता नसल्याचा निर्वाळा दिला. हायकोर्टाने एक विशिष्ट परिस्थितीच्या आधारे हा निकाल दिला.

नवी दिल्ली सामान्यत: कोणाच्याही वैवाहिक जीवनात तणाव असताना, कायद्यानुसार पत्नी किंवा पतीने दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे योग्य मानले जात नाही. पण अशाच एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत दुसऱ्या महिलेसोबत राहणे ही पत्नीवरची क्रूरता मानली नाही. दिल्ली हायकोर्टाने मानवी भावना, संवेदनशीलता लक्षात घेऊन निर्णय दिला आहे.

भारतीय दंड विधान कलम 494 अन्वये, हिंदू विवाह कायद्यान्वये, कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने त्यांचा पती/पत्नी जिवंत असताना (घटस्फोट नसल्यास) दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे. भले, त्यासाठी पती अथवा पत्नीने यासाठी परवानगी दिलेली का असेना. 

काय प्रकरण आहे?

पती दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याचा आरोप करत एका महिलेने पतीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला. महिलेचे 2003 मध्ये लग्न झाले होते पण दोघे 2005 मध्ये वेगळे राहू लागले. त्याचवेळी पतीने आरोप केला आहे की पत्नी आपल्याशी क्रूरपणे वागली आणि तिला तिचा भाऊ आणि नातेवाईकांनी मारहाण केली.

या प्रकरणी खटला दाखल करणार्‍या पत्नीने पतीवर आरोप करताना म्हटले की, त्यांच्या कुटुंबाने त्यांचे लग्न मोठ्या थाटात आयोजित केले होते. असे असतानाही पतीने घरच्यांकडून अनेक मागण्या केल्या. तुम्हाला मुलगा होईल असे सांगत सासूने तिला काही औषधे दिली होती. मात्र तिचा गर्भपात करण्याचा त्यांचा उद्देश होता, असेही तिने आरोपात म्हटले आहे. मात्र, या दाम्पत्याला दोन मुले आहेत. 

कोर्टाने असा निर्णय का दिला?

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे दोघेही अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याची बाब समोर आली. या दरम्यानच्या काळात पती दुसऱ्या महिलेसोबत राहू लागला. अशा परिस्थितीत जर एखादे जोडपे दीर्घकाळ एकमेकांसोबत राहत नसेल तर त्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. अशा परिस्थितीत जर पती दुसर्‍या स्त्रीसोबत सुखसमाधानाने आणि शांततेने राहू लागला तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले. 

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय सुनावताना म्हटले, "घटस्फोट याचिका प्रलंबित असताना प्रतिवादी-पतीने दुसर्‍या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांना दोन मुलगे आहेत हे जरी मान्य केले असले तरी विशिष्ट परिस्थितीत याला क्रूरता म्हणता येणार नाही. जेव्हा पक्षकारांना 2005 पासून एकत्र राहत नाही आणि इतक्या वर्षांच्या विभक्ततेनंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही आणि प्रतिवादी पती दुसर्‍या स्त्रीसोबत राहून शांतता आणि सुख मिळवू शकतो तर त्याला क्रूरता म्हटली जाऊ शकत नाही. 

हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(IA) अंतर्गत क्रूरतेच्या आधारावर तिच्या पतीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. 

कोर्टाने महिलेची वागणूक क्रूर ठरवली

हुंड्यासाठी तिचा छळ आणि शोषण होत असल्याचा दावा पत्नीने केला असला तरी ती आपला दावा सिद्ध करू शकली नाही आणि हे क्रूरतेचे कृत्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

या महिलेने लग्नानंतर दोन मुलांना जन्म दिला. परंतु महिलेने आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाची कोणतीही माहिती दिली नाही, न्यायालयात कोणतेही पुरावे सादर केले नाहीत किंवा पोलिसांत तक्रारही केली नाही. त्याआधारे उच्च न्यायालयाने महिलेचे अपील फेटाळले आणि घटस्फोट मंजूर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम  ठेवला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठात सुरू होती.

दुसऱ्या विवाहावर कायदा काय म्हणतो?

कायद्यानुसार, जोडीदारांपैकी एक जिवंत असताना दुसरा विवाह करणे हा भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार दंडनीय गुन्हा मानला जातो. या कलमानुसार दुसरे लग्न केल्यास सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

भारतात दोन प्रकारचे विवाह आहेत. एक विवाह वैयक्तिक कायद्यानुसार आणि दुसरा विशेष विवाह कायदा, 1956 अंतर्गत होतो. दोन्ही कायद्यांमध्ये पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. उदाहरणार्थ, हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 17 मध्ये दुसऱ्या लग्नासाठी शिक्षेचा उल्लेख आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget