एक्स्प्लोर

विजेची गरज वाढली, सरकार करणार 'या' उपाययोजना, वायू-आधारित वीजनिर्मितीवर देणार भर 

उन्हाळ्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ (Huge increase in electricity demand) होतेय. विजेची गरज भागवण्यासाठी वायू-आधारित विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी  सरकारनं उपाययोजना सुरु केल्या आहेत.

Power Generation : सध्या देशात उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढलाय. बहुंताश भागात तापमानाचा (temperature) पारा हा 40 अंशाच्या पुढ गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस होतोय. दरम्यान, या उन्हाळ्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ (Huge increase in electricity demand) होतेय. विजेची गरज भागवण्यासाठी वायू-आधारित विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी  सरकारकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून अधिकाधिक वीजनिर्मिती होण्याची खबरदारी घेण्यासाठी कलम 11 अंतर्गत निर्देश जारी
 करण्यात आलेत.

देशात वाढली विजेची गरज

उन्हाळ्यात देशात वाढलेली विजेची गरज भागवण्यासाठी भारत सरकारने वायू-आधारित वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून अधिकाधिक वीजनिर्मिती होण्याची खबरदारी घेण्यासाठी सरकारने विद्युत कायदा 2003 च्या कलम 11 अंतर्गत वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना निर्देश जारी केले आहेत. कलम 11 नुसार असामान्य परिस्थितीत उचित सरकार एखाद्या वीजनिर्मिती कंपनीकडे, त्या सरकारच्या निर्देशांनुसार, कोणतीही वीजनिर्मिती केंद्रे चालवण्याची किंवा सांभाळण्याची जबाबदारी सोपवू शकते. मुख्यत्वे व्यावसायिक कारणांमुळे, GBS म्हणजे वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांचा बहुतांश भाग सध्या वापरात नाही. कलम 11 अंतर्गत काढलेले निर्देश, आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांकरिता काढलेल्या निर्देशांशी मिळतेजुळते आहेत. 

दरम्यान, मागणी उच्च असतानाच्या काळात वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून निर्माण होणाऱ्या विजेचे प्रमाण सुयोग्य पद्धतीने वाढवणे हा त्यामागील उद्देश आहे. वीजनिर्मिती आणि पुरवठा यांसंबंधीचे हे निर्देश 1 मे 2024 ते 30 जून 2024 या काळासाठी लागू असतील.

विजेच्या गरजेबद्दलची माहिती ग्रिड-इंडिया कडून वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना पुरवली जाणार आहे. विनिर्दिष्ट केलेल्या व्यवस्थेप्रमाणे, वायू आधारित प्रकल्पातून निर्माण केलेली वीज, किती दिवस पुरवावी लागेल याबद्दलची आगाऊ माहिती ग्रिड-इंडिया कडून वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना पुरवली जाईल. PPA म्हणजे वीज खरेदी करार केलेली आणि वितरण परवाने असलेली वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रे प्रथम PPA करारबद्ध संस्थांना वीज देऊ करतील. जर अशी देऊ केलेली वीज एखाद्या PPA करारबद्ध संस्थेकडून वापरली गेली नाही तर, ती विजेच्या बाजारपेठेत उपलब्ध असेल. PPA करारबद्ध नसलेल्या वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांनी त्यांनी निर्माण केलेली वीज बाजारपेठेतच उपलब्ध करून दिली पाहिजे.

विजेचा पुरेसा पुरवठा तयार करण्यावर भर

या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणांच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापित करण्यात आली आहे. उन्हाळ्यातील वीजेची गरज भागवण्याची काळजी घेण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या निरनिराळ्या उपायांचाच एक भाग म्हणून वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय वीज तथा नवीन आणि नवीकरणक्षम ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांनी या विषयावर अनेक बैठका घेतल्या. उकाड्याच्या दिवसांत वाढलेली ऊर्जा गरज भागवण्यासाठी येणारा भार लक्षात घेऊन तशा दृष्टीने पुरेसा पुरवठा करण्यावर या बैठकांमध्ये भर देण्यात आला.

सरकारनं केलेल्या उपाययोजना काय? 

वीजप्रकल्पांच्या देखभालीचे नियोजित काम पूर्ण करणे
क्षमतेत वाढ करण्याच्या प्रक्रियेला वेग देणे
औष्णिक वीज प्रकल्पांच्या कामकाजावर अंशतः घालण्यात येणारी बंदी थांबवणे
कॅप्टिव्ह निर्मिती केंद्रांकडील अतिरिक्त वीज वापरात आणणे
अतिरिक्त वीज ऊर्जा एक्स्चेंजवर विक्रीसाठी उपलब्ध करून देणे
आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांकरिता कलम 11 अंतर्गत काढलेल्या निर्देशांनुसार वीजनिर्मितीसाठी पूर्ण क्षमता उपलब्ध करून देणे
सर्वोच्च मागणी असण्याच्या काळात जलविद्युत निर्मिती केंद्रांचा उपयोग करणे
कोळशाची उपलब्धता पुरेशी असण्याची काळजी घेण्यासाठी सर्व भागधारकांनी वेळेपूर्वीच नियोजन करून ठेवणे.

महत्वाच्या बातम्या:

दुष्काळात तेरावा महिना! जायकवाडीतून जालना महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा खंडित

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
India Russia Deal : युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget