एक्स्प्लोर

Coronavirus | देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, 62 जिल्ह्यात 80 टक्के रुग्ण!

सध्या सात दिवसांऐवजी चार दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत. दिल्लीतील तब्लिगी जमातीचा कार्यक्रमामुळे कोरोना फैलावाचा वेग आणखी वाढल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

मुंबई : कोरोना व्हायरस देशात वेगाने पसरत आहे. मागील एका आठवड्यात भारतामधील कोरोनाबाधितांची संख्या आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे देशातील 62 जिल्ह्यात तब्बल 80 टक्के कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. 14 एप्रिल रोजी देशातील लॉकडाऊन संपल्यानंतरही या जिल्ह्यांमध्ये सक्ती कायम राहण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे. देशात आतापर्यंत 274 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट आहे.

मागील 24 तासात देशभरात कोरोनाची लागण झालेले 505 नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून चार हजारांच्या पार पोहोचली आहे आणि 100 अधिक जणांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

Coronavirus : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

30 मार्चपर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 1251 होती आणि 32 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, "COVID-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा सध्याचा काळ 4.1 दिवस इतका आहे. मात्र मागील महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर हा काळ 7.4 दिवस इतका असता." म्हणजेच सात दिवसांऐवजी चार दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'कोरोनाच्या प्रसारात एक स्पष्ट भौगोलिक दृष्टीकोनही आहे. देशाच्या 62 जिल्ह्यांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. आम्ही भीलवाडा मॉडेलवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्ही तपासणीची संख्या वाढवत आहोत. मागील दोन दिवसात तपासणीची संख्या दुप्पट झाली आहे. पुढील काही दिवसात ही संख्या पुन्हा एकदा दुप्पट होईल.

Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार!

ज्या 62 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागणी झालेले रुग्ण आहेत, ते सील केले जातील. ही रणनीती भीलवाडामध्ये परिणामकारक ठरली होती. मागील महिन्यात राजस्थानमधील भीलवाडा कोरोना झोन बनला होता. मात्र इथल्या डॉक्टरांनी 14 दिवसातच 26 कोरोनाबाधितांना ठणठणीत बरं केलं. त्यांचे तिसरे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, आणखी काही तपासणी करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Mumbai Corona Update | मुंबईत 433 कोरोनाबाधित, मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट नेमके कोणते? India Lockdown | लॉकडाऊननंतरही सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे बंद राहणार,सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget