एक्स्प्लोर

Farm Law : 'आंदोलनादरम्यान झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबदार', भाजप नेत्याचा आरोप

Rakesh Tikait  : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं (Farmers Protest) नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्याबद्दल भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Rakesh Tikait  : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं (Farmers Protest) नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्याबद्दल भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबादर असल्याचं वक्तव्य भाजप नेते हरिनारायण राजभर यांनी केलं आहे. कृषी कायदे (farm laws) मागे घेण्यासाठी दिल्लीमध्ये मागील वर्षभरापासून आंदोलन करत आहे. सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, पण शेतकरी एमएसपी कायद्यावर (MSP law) ठाम आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन अद्याप मागे घेतलेलं नाही, अशातच भाजप (BJP) नेत्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी खासदार हरिनारायण राजभर (Harinarayan Rajbhar) यांनी भारतीय किसान यूनियनचे नेता राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत यांना जबाबदार मानलं आहे. यासोबत राकेश टिकैत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. राजभर यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना अतिरेकी असेही म्हटलेय. 

तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. मात्र, याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. कृषी कायदे रद्द झाल्याचा फायदा खलिस्तानी गुंडांना होणार आहे, असं वक्तव्य हरिनारायण राजभर यांनी केलं आहे. सरकारच्या मवाळ भुमिकेचा शेतकरी नेत्यांनीच फायदा घेतलाय. दिल्लीतील आंदोलक हे शेतकरी नाहीत, असेही राजभर यावेळी म्हणाले.

 ...तर तीन तासांत मागे घेणार आंदोलन, शेतकऱ्यांनी सांगितल्या अटी
Farmers Protest : मागच्या महिन्यात केंद्र सरकारकडून हे तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, सरकारच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. एमएसपी (MSP law) कायदा तयार केला तर तीन तासांत आंदोलन मागे घेऊ, अशी भूमीका शेतकऱ्यांनी(farmers) घेतली आहे.  केंद्र सरकारने नवे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु, याबरोबरच आंदोलक शेतकऱ्यांच्या आणखी काही महत्त्वाच्या मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या पिकाला एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळावी ही त्यातली महत्त्वाची मागणी आहे. ही मागणी मान्य करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. जर एमएसपी कायदा मंजूर केला तर अवघ्या तीन तासात आंदोलन मागे घेऊ अशी भूमीकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे.

या मागणीवर ठाम आहेत शेतकरी 
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता शेतकरी एमएसपी कायदा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी तर आता आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. परंतु, सर्वांचे लक्ष आता सरकारी आमंत्रणावर आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सरकारही या मागण्यांवर लवकरात-लवकर चर्चा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकरी नेत्यांना फोनही करण्यात आले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का आणि शेतकरी एवढ्या दीर्घ काळापासून सुरू असलेले आंदोलन मागे घेणार का हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

एमएसपी म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वर्षांपासून एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत ही व्यवस्था सुरू आहे. केंद्र सरकार पिकांसाठी एक किमान दर ठरवते. यालाच हमीभाव देखील म्हणतात. समजा शेतकऱ्यांच्या पिकांचे दर बाजारात कोसळले तरी, केंद्र सरकार या दराने ते उत्पादन शेतकऱ्यांकडून खरेदी करते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही यंत्रणा आहे. त्यांच्यासाठी ही एक सामाजिक सुरक्षा आहे. 60 च्या दशकात सरकारने अन्नधान्याची कमतरता कमी करण्यासाठी सर्वांत आधी एमएसपी द्यायला सुरुवात केली होती. सरकारला गहू खरेदी करून पीडीएस योजनेंतर्गत गरीबांमध्ये वाटण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget