एक्स्प्लोर

Bihar Election 2020 | बिहार निवडणुकीचा तिसरा टप्पा ठरवणार सरकार कोणाचे? मतदानाला सुरुवात

बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (7 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात राजदने सर्वाधिक म्हणजे 46 उमेदवार उभे केले आहेत. तर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांचे भविष्य पणाला लागले आहे.अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडीच्या घटना घडत आहेत.

पाटणा: बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (7 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. असे सांगितले जाते की, या टप्प्यातील मतदानात जो पक्ष आघाडी घेईल त्याचा सरकार बनवण्याचा दावा अधिक मजबूत होईल. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत या टप्प्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी चढाओढ सुरु आहे.

तिसऱ्या टप्प्यात एनडीएच्य़ा माध्यामातून संयुक्त जनता दलाने आपले 37 उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत तर भाजपने 35 उमेदवार उभे केले आहेत. महागठबंधनच्या माध्यमातून राष्ट्रीय जनता दलाने सर्वात जास्त म्हणजे 46 उमेदवार उभे केले आहेत तर कॉंग्रेसने 25 उमेदवार उभे केले आहेत. त्याचसोबत लोक जनशक्ती पक्षाच्या 42 उमेदवारांचेही भवितव्य पणाला लागले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत या 15 जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 24 जागा या संयुक्त जनता दलाने जिंकल्या होत्या तर राजदने 20 जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गेल्या वेळी भाजपने या क्षेत्रातून 19 तर कॉंग्रेसने 10 जागांवर विजयाची पताका फडकवली होती.

या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीत नितीश कुमार सरकारच्या 12 मंत्र्यांच्या सोबत एकूण 1204 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन एक नवे रेकॉर्ड करावे असे आवाहन केलंय तर कॉंग्रेस नेते राहुल गांधीनीही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंत 18 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या येत आहेत. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला घोषित होणार आहे.

ही माझी शेवटची निवडणूक: नितीश कुमार गुरुवारी पूर्णिया जिल्ह्यातील धमदाहा येथे एका सभेला संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले होते की, "ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल. शेवट चांगला तर सगळंच चांगलं होते."

नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. "नितीश कुमार आता थकले आहेत, त्यांना त्याचा पराभव समोर दिसतोय म्हणून ते आता मतदारांना भावनिक आवाहन करत आहेत," अशी टीका राजदच्या तेजस्वी यादव यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: Bihar Election 2020 : बिहारच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं, जंगलराजचाही पराभव; पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा Bihar Election 2020 | कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे निवडणूक आचारसंहिते उल्लंघन नाही: निवडणूक आयोग
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Embed widget