एक्स्प्लोर

Bihar Election 2020 | बिहार निवडणुकीचा तिसरा टप्पा ठरवणार सरकार कोणाचे? मतदानाला सुरुवात

बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (7 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात राजदने सर्वाधिक म्हणजे 46 उमेदवार उभे केले आहेत. तर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांचे भविष्य पणाला लागले आहे.अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडीच्या घटना घडत आहेत.

पाटणा: बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (7 नोव्हेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. असे सांगितले जाते की, या टप्प्यातील मतदानात जो पक्ष आघाडी घेईल त्याचा सरकार बनवण्याचा दावा अधिक मजबूत होईल. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत या टप्प्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी चढाओढ सुरु आहे.

तिसऱ्या टप्प्यात एनडीएच्य़ा माध्यामातून संयुक्त जनता दलाने आपले 37 उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत तर भाजपने 35 उमेदवार उभे केले आहेत. महागठबंधनच्या माध्यमातून राष्ट्रीय जनता दलाने सर्वात जास्त म्हणजे 46 उमेदवार उभे केले आहेत तर कॉंग्रेसने 25 उमेदवार उभे केले आहेत. त्याचसोबत लोक जनशक्ती पक्षाच्या 42 उमेदवारांचेही भवितव्य पणाला लागले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत या 15 जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 24 जागा या संयुक्त जनता दलाने जिंकल्या होत्या तर राजदने 20 जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गेल्या वेळी भाजपने या क्षेत्रातून 19 तर कॉंग्रेसने 10 जागांवर विजयाची पताका फडकवली होती.

या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीत नितीश कुमार सरकारच्या 12 मंत्र्यांच्या सोबत एकूण 1204 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन एक नवे रेकॉर्ड करावे असे आवाहन केलंय तर कॉंग्रेस नेते राहुल गांधीनीही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंत 18 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या येत आहेत. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला घोषित होणार आहे.

ही माझी शेवटची निवडणूक: नितीश कुमार गुरुवारी पूर्णिया जिल्ह्यातील धमदाहा येथे एका सभेला संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले होते की, "ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल. शेवट चांगला तर सगळंच चांगलं होते."

नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. "नितीश कुमार आता थकले आहेत, त्यांना त्याचा पराभव समोर दिसतोय म्हणून ते आता मतदारांना भावनिक आवाहन करत आहेत," अशी टीका राजदच्या तेजस्वी यादव यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: Bihar Election 2020 : बिहारच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं, जंगलराजचाही पराभव; पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा Bihar Election 2020 | कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे निवडणूक आचारसंहिते उल्लंघन नाही: निवडणूक आयोग

महत्त्वाच्या बातम्या

सरकार घेणार मोठा निर्णय घेणार, लवकरच मंत्रीमंडळात बदल होण्याची शक्यता, नेमकी काय आहे भाजपची रणनीती?
सरकार घेणार मोठा निर्णय घेणार, लवकरच मंत्रीमंडळात बदल होण्याची शक्यता, नेमकी काय आहे भाजपची रणनीती?
Padma Awards : रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, त्याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, त्याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास
भारताचा व्यापार वाढला, जगातील सर्वात मोठा 8 वा सेवा निर्यातदार देश, नीती आयोगाच्या अहवालातून महत्वाची माहीती समोर 
भारताचा व्यापार वाढला, जगातील सर्वात मोठा 8 वा सेवा निर्यातदार देश, नीती आयोगाच्या अहवालातून महत्वाची माहीती समोर 

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
Embed widget