एक्स्प्लोर

या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

या सगळ्याची ठिणगी उडण्यास कारण ठरलं ते सीबीआयचे स्पेशल जज बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला.

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींच्या जाहीर पत्रकार परिषदेने आज संपूर्ण देशाला एक मोठा धक्का दिला. गेल्या दोन महिन्यांमधे खटल्यांच्या वाटपावरुन असंतोष होता हे खरं असलं तरी या सगळ्याची ठिणगी उडण्यास कारण ठरलं ते सीबीआयचे स्पेशल जज बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला. पत्रकार परिषदेतही जस्टिस गोगोई यांनी पत्रकारांना तुमचा आजचा मुद्दा हा लोया यांच्या प्रकरणाशी निगडीत आहे का, असं विचारल्यावर त्यांनी होय असं सांगत होकारार्थी मान डोलावली होती. मुळात या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टात असं काय झालं की प्रकरण इतकं टोकाला जावं याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. काल महाराष्ट्रातले एकच पत्रकार बंधुराज लोणे यांनी त्यांच्या वकील आश्विनी शिनॉय यांच्या वतीने लोयांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करत याचिका दाखल केलेली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन झाल्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठाने या प्रकरणावर सुनावणी करण्यास होकार दिला. त्यावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीही सुरु झाली. त्यावर महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याबाबत नोटीसही बजावण्यात आलीय. पण इतक्या महत्वाचं हे प्रकरण सरन्यायाधीशांनी सोपवलं ते तुलनेने ज्युनियर पीठाकडे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती मोहन एम शांतनागौदार यांच्या पीठाकडे हे प्रकरण दिल्याचं आज सकाळी उघड झालं. त्यानंतर वरिष्ठता डावलण्यात आलेल्या या चारही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रांची सकाळी भेट घेतली. इतक्या महत्वाचं प्रकरण हे ज्युनियर पीठाकडे जाणं ठीक नसल्याचं सांगत त्यांनी नाराजी उघड केली. सरन्यायाधीशांच्या प्रतिसादाने समाधान न झाल्याने अखेर त्यांनी मीडियासमोर जाण्याचा मार्ग स्वीकारला. लोयांच्या मृत्यूप्रकरणाबद्दलचं हे प्रकरण इतक्या ज्युनियर पीठाकडे सोपवल्याबद्दल सुप्रीम कोर्टातल्या अनेक वकीलांनीही आश्चर्य व्यक्त केलं. इतक्या संख्येने ज्येष्ठ न्यायमूर्तींना वगळून या ज्युनियर नावांवर शिक्कामोर्तब व्हावं, या गोष्टी पद्धतीला धरुन नसल्याचंही अनेकांनी सांगितलं. खटल्यांचं वाटप करतानाचा हा प्रकार पहिल्यांदाच होत नव्हता. याच्या आधीही गेल्या दोन महिन्यांपासून असे प्रकार होतच होते. चल्लमेश्वर या वरिष्ठतेने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्तींनी ओडिशातल्या मेडिकल कॉलेजमधल्या केसमध्ये ( ज्यात खालच्या कोर्टातल्या न्यायाधीशांनीच पैसे खाल्ल्याचा आरोप होता.) त्यात पाच वरिष्ठ न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशीचा आदेश दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी सरन्यायाधीशांनी आपल्या मर्जीतल्या पाच न्यायमूर्तींची नेमणूक करुन हा आदेश फिरवला होता. अशा पद्धतीने खटल्यांचं वाटप करताना सरन्यायाधीश ज्येष्ठ न्यायमूर्तींना डावलत महत्वाच्या केसेस आपल्या मर्जीतल्या न्यायमूर्तींना देत असल्याचा आरोप आहे. आज जज लोया यांच्या मृत्यूप्रकरणाने या सगळ्या असंतोषाचा कडेलोट झाला आणि न्यायमूर्तींनी जाहीर पत्रकार परिषदेचा मार्ग स्वीकारला. संबंधित बातम्या : सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत? सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Embed widget