एक्स्प्लोर

कांजुरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर घनकचरा विघटन प्रकल्प सुरू करण्यावरील स्थगिती हायकोर्टाने उठवली

कांजुरमार्ग येथील मुंबई महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या अंतरिम विस्ताराबाबत गेल्यावर्षी देण्यात आलेली स्थगिती अखेरीस गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने हटविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह मुंबईकरांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कांजुरमार्ग येथील मुंबई महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या अंतरिम विस्ताराबाबत गेल्यावर्षी देण्यात आलेली स्थगिती अखेरीस गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने हटविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत सध्या डंपिंग ग्राऊंडची भीषण समस्या निर्माण झाली आहे. मुलुंडमधील डंपिंग पूर्ण बंद झाल्यानं त्याचा भार देवनारवर पडत आहे. मुंबई शहर-उपनगरांमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेनं कांजुरमार्ग मध्ये सुरू केला आहे. मात्र या प्रकल्पामुळे सागरी किनारा नियमांचा भंग करण्यात आला असून सागरी किनारा क्षेत्रात असा प्रकल्प राबविता येत नाही, असा दावा करत वनशक्ती या समाजसेवी संस्थेनं हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये यावर सुनावणी घेत न्यायालयाने या प्रकल्पाला अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र दिवसेंदिवस घनकचऱ्याचे प्रमाण वाढत असून त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे, तसेच देवनार डंपिंगची मुदत डिसेंबर 2019 अखेरपर्यंतच आहे, त्यामुळे कांजुरमार्गवरील कचऱ्याचे विघटन करण्याच्या प्रकल्पावरील स्थगिती हटविण्याची मागणी महापालिकेच्या वतीने अॅड अनील साखरे यांनी केली होती. मुंबईत दरदिवशी साधारणतः 6700 मेट्रीक टन कचरा गोळा होतो, यापैकी कांजुरमध्ये 5000 ते 5500 कचऱ्याचे विघटन होऊ शकतं, त्यामुळे मुंबईच्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करणे अत्यावश्‍यक आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं होत.
मात्र हा परिसर इको सेन्सीटीव्ह झोनमध्ये येत असून जवळच फ्लेमिंगोसाठी अभयारण्य तयार करण्यासाठीचा भूखंड राखीव आहे, असा युक्तिवाद याचिकादारांकडून करण्यात आला होता. तर येथील निम्मी जमीन सीआरझेडमध्ये असून निम्म्या जागेवर सुमारे 66 हेक्‍टरवर हा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे त्याला सीआरझेड कायद्यानुसार प्रतिबंध नाही, असा दावा महापालिकेने केला होता. न्यायालयाने या प्रकल्पाला दिलेली स्थगिती हटविण्याचा आदेश दिले असले तरी याचिकांमधील अन्य मुद्दे अद्याप खुले ठेवत असल्याचेही स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 

व्हिडीओ

Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget