एक्स्प्लोर

नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले

राज्यभरात बिबट्यांचे पशुबरोबरच माणसांवर देखील हल्ले (Leopard attacks) वाढत चालल्याच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ले वाढले आहेत.

Leopard attacks : राज्यभरात बिबट्यांचे पशुबरोबरच माणसांवर देखील हल्ले (Leopard attacks) वाढत चालल्याच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दोन वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 95 नागरिक जखमी झाले आहेत. तसेच 6 हजार 850 जनावरंचा मृत्यू  झाला आहे. दरम्यान, बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील हे न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2022 -2023 या कालावधीमध्ये  बिबट्याच्या हल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर 50 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच 3 हजार 773 जनावरांचा  बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण 4 कोटी 34 लाख 66 हजार 35 रुपये एवढी मदत शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तर 2023 -24 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 व्यक्तींचा मृत्यू तर 45 व्यक्ती जखमी  झाले आहेत. तर 3 हजार 77 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासाठी 4 कोटी 90 लाख 79 हजार 327 रुपये एवढी मदत शासनाकडून करण्यात आली आहे.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील बिबट्याचा वावर शेतकरी आणि नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. यावर चार दिवसांत उपाययोजना न केल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर ,कर्जुले हर्या, पोखरी, वासुंदे या गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वीच खडकवाडी या ठिकाणी एका शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू झाला होता. तर देसवडे येथे देखील शेतकरी योगेश गोळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते देखील गंभीर जखमी झाले होते. या परिसरात सतत बिबट्याचे  हल्ले होत असल्याने शेतकरी आणि गावकरी भयभीत झाले आहेत.

सुजय विखे पाटील जनहित याचिका दाखल करणार

गेल्या काही दिवसात बिबट्याचा मानवी वस्तीत संचार वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप बालकांचा देखील मृत्यू झाला आहे. याबाबत आता जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय माजी खासदार सुजय विखे यांनी घेतला आहे. बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. या संदर्भात नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतात पाणी धरताना अडचणी येत असल्याचे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget