एक्स्प्लोर

Ahmednagar News : नामांतरापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर, विभाजन करण्याची राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

Ahmednagar News : नामांतराआधी अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करा म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याप्रमाणेच दक्षिण नगर जिल्ह्याचाही विकास होईल असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केला आहे. 

Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. 17412 चौ. किमी असलेला हा जिल्हा तसा दोन भागात विभागाला आहे. उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. जसं अहमदनगरच्या नामांतरावरुन (Ahmednagar Name Change) मागच्या वर्षांपासून राजकारण रंगत आहे, तसंच ते जिल्हा विभाजनावरुन (Division) देखील रंगत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधिमंडळात अहमदनगरच्या नामांतराचा तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि अहमदनगरचे राजकारण तापलं. मात्र, यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच नामांतराआधी जिल्ह्याचं विभाजन करा म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याप्रमाणेच दक्षिण नगर जिल्ह्याचाही विकास होईल असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपस्थित केला आहे. 

अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा हा काही आताच आलेला नाही तर हा जुनाच मुद्दा आहे त्यावर चर्चा नव्याने होऊ लागली आहे.

अहमदनगरच्या विभाजनाला खासदार सुजय विखे पाटील यांचा विरोध

तर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. जिल्हा विभाजन केल्याने दक्षिण नगर जिल्ह्याला नेमका काय फायदा होईल याबाबत आधी मागणी करणाऱ्यांनी सांगावं, कोणताही विकासाचा आराखडा नसताना अशी मागणी करणं चुकीचं आहे असं मतं खासदार विखे पाटील यांनी मांडले.

विभाजन करुन जिल्ह्यांना सावित्रीबाई आणि अहिल्याबाई यांची नावं द्यावी : सचिन खरात

खरं आधीपासूनच अहमदनगरच राजकारण हे राज्याच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. मात्र, यात नगर दक्षिण आणि नगर उत्तरचा विचार केला तर उत्तर नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांची संख्या आणि प्रभाव अधिक आहे. दक्षिणेकडील नेत्यांना आपलं नेतृत्व गुण दाखवण्याची फारशी संधी काही मिळाली नाही. त्यातच निधी वाटपावरुनही अनेकदा दक्षिण आणि उत्तरेकडील नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. यात प्रश्नी जशी स्थानिक नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत तशाच जिल्ह्याबाहेरील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करुन उत्तर अहमदनगरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं तसंच दक्षिण अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.

औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गामुळे दक्षिण नगरचा विकास?

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे यावरुन जसे मतभेद आहेत तसं दक्षिण नगर जिल्ह्यात विभाजन झाले तर शिर्डी, शनिशिंगणापूर हे आपल्या जिल्ह्यात राहणार नाही हा अस्मितेचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र सध्या होऊ घातलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गामुळे पुणे आणि नगरचे अंतर कमी होणार असल्याने भविष्यात दक्षिण नगर जिल्हा हा पुण्याचे उपनगर म्हणून विकसित होऊ शकतो.

जशी अहमदनगरच्या नामांतरावरुन अनेकांची अनेक मतं आहेत तशी ती विभाजनाबाबतही आहे. त्यामुळे आता दोन्ही मुद्द्यांवर नेमका काय निर्णय होईल हे येत्या काळात पाहावं लागेल. मात्र हे मुद्दे पुन्हा पुन्हा समोर आणून राजकीय नेते चर्चेचं गुऱ्हाळ तेवढं सुरु ठेवतात हे नक्की.

संबंधित बातमी

Ahmednagar News : अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत ठराव मांडा, सरकारचं महापालिकेला पत्र

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget