एक्स्प्लोर

Ahmednagar News : नामांतरापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर, विभाजन करण्याची राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

Ahmednagar News : नामांतराआधी अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करा म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याप्रमाणेच दक्षिण नगर जिल्ह्याचाही विकास होईल असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केला आहे. 

Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. 17412 चौ. किमी असलेला हा जिल्हा तसा दोन भागात विभागाला आहे. उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. जसं अहमदनगरच्या नामांतरावरुन (Ahmednagar Name Change) मागच्या वर्षांपासून राजकारण रंगत आहे, तसंच ते जिल्हा विभाजनावरुन (Division) देखील रंगत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधिमंडळात अहमदनगरच्या नामांतराचा तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि अहमदनगरचे राजकारण तापलं. मात्र, यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच नामांतराआधी जिल्ह्याचं विभाजन करा म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याप्रमाणेच दक्षिण नगर जिल्ह्याचाही विकास होईल असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपस्थित केला आहे. 

अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा हा काही आताच आलेला नाही तर हा जुनाच मुद्दा आहे त्यावर चर्चा नव्याने होऊ लागली आहे.

अहमदनगरच्या विभाजनाला खासदार सुजय विखे पाटील यांचा विरोध

तर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. जिल्हा विभाजन केल्याने दक्षिण नगर जिल्ह्याला नेमका काय फायदा होईल याबाबत आधी मागणी करणाऱ्यांनी सांगावं, कोणताही विकासाचा आराखडा नसताना अशी मागणी करणं चुकीचं आहे असं मतं खासदार विखे पाटील यांनी मांडले.

विभाजन करुन जिल्ह्यांना सावित्रीबाई आणि अहिल्याबाई यांची नावं द्यावी : सचिन खरात

खरं आधीपासूनच अहमदनगरच राजकारण हे राज्याच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. मात्र, यात नगर दक्षिण आणि नगर उत्तरचा विचार केला तर उत्तर नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांची संख्या आणि प्रभाव अधिक आहे. दक्षिणेकडील नेत्यांना आपलं नेतृत्व गुण दाखवण्याची फारशी संधी काही मिळाली नाही. त्यातच निधी वाटपावरुनही अनेकदा दक्षिण आणि उत्तरेकडील नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. यात प्रश्नी जशी स्थानिक नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत तशाच जिल्ह्याबाहेरील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करुन उत्तर अहमदनगरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं तसंच दक्षिण अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.

औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गामुळे दक्षिण नगरचा विकास?

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे यावरुन जसे मतभेद आहेत तसं दक्षिण नगर जिल्ह्यात विभाजन झाले तर शिर्डी, शनिशिंगणापूर हे आपल्या जिल्ह्यात राहणार नाही हा अस्मितेचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र सध्या होऊ घातलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गामुळे पुणे आणि नगरचे अंतर कमी होणार असल्याने भविष्यात दक्षिण नगर जिल्हा हा पुण्याचे उपनगर म्हणून विकसित होऊ शकतो.

जशी अहमदनगरच्या नामांतरावरुन अनेकांची अनेक मतं आहेत तशी ती विभाजनाबाबतही आहे. त्यामुळे आता दोन्ही मुद्द्यांवर नेमका काय निर्णय होईल हे येत्या काळात पाहावं लागेल. मात्र हे मुद्दे पुन्हा पुन्हा समोर आणून राजकीय नेते चर्चेचं गुऱ्हाळ तेवढं सुरु ठेवतात हे नक्की.

संबंधित बातमी

Ahmednagar News : अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत ठराव मांडा, सरकारचं महापालिकेला पत्र

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
Nitish Kumar: अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 19 Nov | ABP Majha
Supreme Court on Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची  सुनावणी आता मंगळवारी
Rajan Patil Angar Nagar Panchayat : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; मुलासाठी राजन पाटलांची माफी
Ujwala Thite Angar Nagarpanchayat :अर्ज फेटाळला,उज्ज्वला थिटेंचा राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठा डाव
Prakash Solanke : Dhananjay Munde चांगले वक्ते पण मी अजित पवारांची सभा मागितली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
Nitish Kumar: अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी
Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी
'सही रे सही'! अवघ्या एका सहीने अनगरमध्ये बंदुकधारी पोलिस घेऊन अर्ज दाखल करायला आलेल्या उज्वला थिटेंचा अर्ज बाद; 'टेक्निक' वापरून सही गायब केली का? कोणी केला आरोप??
'सही रे सही'! अवघ्या एका सहीने अनगरमध्ये बंदुकधारी पोलिस घेऊन अर्ज दाखल करायला आलेल्या उज्वला थिटेंचा अर्ज बाद; 'टेक्निक' वापरून सही गायब केली का? कोणी केला आरोप??
Loha Municipal Council: मेव्हणे, मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे अन् बरंच काही! भाजपचा घराणेशाहीवर आरोप, पण नांदेडमध्ये एकाच घरात सहा जणांना उमेदवारी
मेव्हणे, मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे अन् बरंच काही! भाजपचा घराणेशाहीवर आरोप, पण नांदेडमध्ये एकाच घरात सहा जणांना उमेदवारी
साधू हत्याकांडात ज्या मुख्य आरोपीला भाजपने फाशीची मागणी केली त्याला भाजपत घेतला, या अचाट हिंदुत्वासाठी फडणवीस, चव्हाणांचा सत्कारच करायला हवा; 'सामना'तून हल्लाबोल
साधू हत्याकांडात ज्या मुख्य आरोपीला भाजपने फाशीची मागणी केली त्याला भाजपत घेतला, या अचाट हिंदुत्वासाठी फडणवीस, चव्हाणांचा सत्कारच करायला हवा; 'सामना'तून हल्लाबोल
Embed widget