एक्स्प्लोर

Salt Balance : जेवणात चुकून जास्तीचं मीठ पडलंय? काळजी करू नका! ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि खारटपणा कमी करा!

Salt Balance : कधी कधी स्वयंपाक करताना आपल्या हातून एखाद्या पदार्थात चुकून जास्त मीठ पडतं, अशावेळी संपूर्ण जेवणाची चव बिघडून जाते. अशावेळी तुम्ही तो पदार्थ फेकून देत असाल तर थांबा! आधी हे वाचा..

Salt Balance : एखाद्या पदार्थाची चव तेव्हाच वाढते, जेव्हा त्यात योग्य प्रमाणात मीठ (Salt) मिसळलं जातं. जेवणातील मिठाचे प्रमाण एखाद्या पदार्थाची चव जशी वाढवू शकतं, तशी ती बिघडवू देखील शकतं. आपण अनेकवेळा पाहतो की, जेवण बनवणारा व्यक्ती अनेकदा आपण करत असलेल्या जेवणाची चव चाखून त्यातील मीठाचा अंदाज घेत असतो. कधी कधी स्वयंपाक बनवण्याच्या गडबडीत त्यात मीठ चुकून जास्त पडते. अशा वेळी तो पदार्थ तर खारट होतोच, पण संपूर्ण जेवणाची चव बिघडून जाते. अशावेळी अनेकदा तो पदार्थ फेकून देण्याची वेळ येते. तुम्ही देखील असंच करत असाल, तर थांबा! आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हा अनावश्यक खारटपणा कमी करता येईल...

दही

आपल्यापैकी बरेच लोक जेवणासोबत दही देखील खातात. दही जेवणाची लज्जत तर वाढवतेच, पण जेवणात पडलेले अधिकचे मीठ कमी करण्यासाठी देखील दही उपयोगी पडते. भाजीत जास्त झालेले मीठ कमी करण्यासाठी त्यात एक वाटी दही मिसळा आणि भाजीला एक उकळी येऊ द्या. भाजीत दही मिसळल्याने त्यातील मिठाचे प्रमाण कमी होते आणि भाजीची चव देखील वाढते.

भाजलेले बेसन

भाजीत मीठ जास्त झाले असले तर, अशावेळी बेसन देखील कामी येते. यासाठी एक चमचा बेसन भाजून घ्या आणि ते भाजीत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिसळा. भाजीत बेसन टाकताच त्यातील मीठ संतुलित होईल.

उकडलेला बटाटा

उकडलेल्या बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची असली, तरी उकडलेले बटाटेहे जेवणातील अतिरिक्त मीठ देखील कमी करू शकतात. यासाठी भाजीतील ग्रेव्हीच्या प्रमाणानुसार उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. आता हा उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा भाजीत मिसळा. याने भाजीतील मीठ लगेच कमी होईल. भाजीतच नव्हे तर, बटाटे डाळीतील किंवा आमटीमधील अतिरिक्त मीठही कमी करू शकतात.

लिंबाचा रस

एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले तर त्यात थोडासा लिंबू पिळताना आपण आपल्या आईला पहिलेच असेल. एखाद्या पदार्थात पडलेले अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. सुकी भाजी असो वा ग्रेव्ही भाजी किंवा पोहे, अशा पदार्थांमध्ये मीठ जास्त झाले असेल तर, त्यात गरजेनुसार 2 ते 3 चमचे लिंबाचा रस मिसळू शकता. याने मीठाचे प्रमाण संतुलित होईल.

हेही वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Embed widget