एक्स्प्लोर

Salt Balance : जेवणात चुकून जास्तीचं मीठ पडलंय? काळजी करू नका! ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि खारटपणा कमी करा!

Salt Balance : कधी कधी स्वयंपाक करताना आपल्या हातून एखाद्या पदार्थात चुकून जास्त मीठ पडतं, अशावेळी संपूर्ण जेवणाची चव बिघडून जाते. अशावेळी तुम्ही तो पदार्थ फेकून देत असाल तर थांबा! आधी हे वाचा..

Salt Balance : एखाद्या पदार्थाची चव तेव्हाच वाढते, जेव्हा त्यात योग्य प्रमाणात मीठ (Salt) मिसळलं जातं. जेवणातील मिठाचे प्रमाण एखाद्या पदार्थाची चव जशी वाढवू शकतं, तशी ती बिघडवू देखील शकतं. आपण अनेकवेळा पाहतो की, जेवण बनवणारा व्यक्ती अनेकदा आपण करत असलेल्या जेवणाची चव चाखून त्यातील मीठाचा अंदाज घेत असतो. कधी कधी स्वयंपाक बनवण्याच्या गडबडीत त्यात मीठ चुकून जास्त पडते. अशा वेळी तो पदार्थ तर खारट होतोच, पण संपूर्ण जेवणाची चव बिघडून जाते. अशावेळी अनेकदा तो पदार्थ फेकून देण्याची वेळ येते. तुम्ही देखील असंच करत असाल, तर थांबा! आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हा अनावश्यक खारटपणा कमी करता येईल...

दही

आपल्यापैकी बरेच लोक जेवणासोबत दही देखील खातात. दही जेवणाची लज्जत तर वाढवतेच, पण जेवणात पडलेले अधिकचे मीठ कमी करण्यासाठी देखील दही उपयोगी पडते. भाजीत जास्त झालेले मीठ कमी करण्यासाठी त्यात एक वाटी दही मिसळा आणि भाजीला एक उकळी येऊ द्या. भाजीत दही मिसळल्याने त्यातील मिठाचे प्रमाण कमी होते आणि भाजीची चव देखील वाढते.

भाजलेले बेसन

भाजीत मीठ जास्त झाले असले तर, अशावेळी बेसन देखील कामी येते. यासाठी एक चमचा बेसन भाजून घ्या आणि ते भाजीत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिसळा. भाजीत बेसन टाकताच त्यातील मीठ संतुलित होईल.

उकडलेला बटाटा

उकडलेल्या बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची असली, तरी उकडलेले बटाटेहे जेवणातील अतिरिक्त मीठ देखील कमी करू शकतात. यासाठी भाजीतील ग्रेव्हीच्या प्रमाणानुसार उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. आता हा उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा भाजीत मिसळा. याने भाजीतील मीठ लगेच कमी होईल. भाजीतच नव्हे तर, बटाटे डाळीतील किंवा आमटीमधील अतिरिक्त मीठही कमी करू शकतात.

लिंबाचा रस

एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले तर त्यात थोडासा लिंबू पिळताना आपण आपल्या आईला पहिलेच असेल. एखाद्या पदार्थात पडलेले अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. सुकी भाजी असो वा ग्रेव्ही भाजी किंवा पोहे, अशा पदार्थांमध्ये मीठ जास्त झाले असेल तर, त्यात गरजेनुसार 2 ते 3 चमचे लिंबाचा रस मिसळू शकता. याने मीठाचे प्रमाण संतुलित होईल.

हेही वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget