एक्स्प्लोर

Employee Health : कर्मचाऱ्यांनो..Work आणि Personal Life मध्ये संतुलन राखण्याचा खरा मंत्र सापडला! तणावासारख्या समस्याही दूर राहतील

Employee Health : वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ज्याला संतुलन राखता येईल, त्याचे जीवन सुखी समजले जाते. जाणून घ्या काही प्रभावी टिप्स

Employee Health : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, विविध जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले संतुलन राखणे जमतेच असे नाही. कारण वास्तविक जीवनात असे संतुलन राखणे अजिबात सोपे नाही. यामुळे अनेकदा लोक मानसिक तणावाखाली येतात, तसेच ते तणाव किंवा बर्नआउट सारख्या समस्यांना बळी पडतात. ही समस्या टाळण्यासाठी आज आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला तणावापासून दूर राहण्यास मदत करतील.


वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कसं संतुलन राखाल?

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे हे एक सुखी जीवनाचे रहस्य आहे. तुम्ही हे विविध लोकांकडून किंवा सोशल मीडियावर अनेकदा ऐकले असेल, हे संतुलन राखण्यात फार कष्ट घ्यावे लागतात. काही जणांना यात समतोल राखता येत नसल्यामुळे, काम करणारे लोक अनेकदा नाखूष किंवा खूप तणावाखाली राहतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन निर्माण करू शकता.


रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा

दररोज रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा, ज्यासाठी तुम्ही आज ज्याच्याबद्दल कृतज्ञ आहात. हे एक सहकारी, मित्र किंवा इतर काहीही असू शकते, ज्याबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे. यामुळे तुमचे लक्ष तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला आनंद वाटेल.


सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण करा

कामाच्या ठिकाणी आनंदी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण केले पाहिजेत. त्यांना मदत करा, त्यांच्याकडून मदत घ्या, हसवा आणि विनोद करा आणि एकमेकांना पुढे जाण्यास मदत करा. असे केल्याने तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील आणि तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यास चांगले वाटेल.

 

प्रत्येक कामात परिपूर्णता मिळवता येत नाही

हे समजून घेणे महत्वाचे आहे की, आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता प्राप्त करणे अशक्य आहे. त्यामुळे कामाकडे निरोगी दृष्टीकोन ठेवा. यामुळे तुमचा मानसिक थकवा कमी होईल आणि तुम्हाला कामाचा आनंद मिळेल. म्हणूनच, प्रत्येक कामात परिपूर्णता शोधण्याचा प्रयत्न न करता आपल्या कामाचा आनंद घेणे महत्वाचे आहे.

 

बदल स्वीकारा

तुमच्या कार्यालयात कोणतेही बदल होणार नाहीत हे आवश्यक नाही. त्यामुळे कामाच्या बाबतीत लवचिक राहणे गरजेचे आहे. नवीन कल्पनांचा उपयोग किंवा गोष्टी करण्याच्या नवीन पद्धतींचा अवलंब करण्यास घाबरू नका. असे केल्याने तुमची चिंता कमी होईल आणि तुम्हाला ऑफिसमध्ये चांगले वाटेल.

 

सीमा निर्धारित करा

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सीमा सेट करा आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा. जसे की, ऑफिस सोडल्यानंतर कुटुंबावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. वारंवार ई-मेल न तपासणे, रात्री उशिरापर्यंत न जागणे आणि ओव्हरटाइम काम करणे इ. याच्या मदतीने तुम्ही बर्नआउटचे बळी होणार नाही, यामुळे तुम्ही कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकाल.

 

 

हेही वाचा>>>

Employee Health : करिअर आहेच, पण रोज 10-12 तास काम करत असाल तर सावधान! हृदयावर होणारा परिणाम जाणून थक्क व्हाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
Shani Transit 2025:  29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
Supreme Court on Maharashtra Politics : 'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटमABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 26 March 2025Dhananjay Deshmukh : देशमुख प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावं, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजेEknath Khadse : महत्वाचे प्रश्न एका बाजूला राहिले, दुर्दैवानं पूर्ण अधिवेशन वाया गेलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
Shani Transit 2025:  29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
Supreme Court on Maharashtra Politics : 'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
Nilesh Ojha : दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
Eknath Khadse: विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
Supreme Court on Cutting Down Trees : झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Embed widget