एक्स्प्लोर

Abp Majha Sahitya: सैन्याची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये आले आनंद बक्षी, बंदुकऐवजी पेन घेतलं हाती

Anand Bakshi Death Anniversary : आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशके सर्वांच्या मनावर राज्य केलं.

Anand Bakshi Death Anniversary : आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशके सर्वांच्या मनावर राज्य केलं. चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे 2002 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. आनंद बक्षी याची आज (30 मार्च) पुण्यतिथी आहे. चला तर त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊ...

आनंद बक्षी यांचे वडील रावळपिंडीत बँक मॅनेजर होते. लहान वयातच आनंद टेलिफोन ऑपरेटर म्हणून सैन्यात भरती झाले. मात्र त्यांची इच्छा मुंबई येऊन चित्रपटसृष्टीत काम करण्याची होती. 1947 साली फाळणीनंतर बक्षी कुटुंब निर्वासित म्हणून भारतात आले. त्यावेळी मायानगरी मुंबईत येऊन त्यांनी चित्रपटात काम मिळावं म्हणून धडपड सुरू केली. मात्र त्यांना काम मिळालं नाही. यानंतर ते पुन्हा सैन्यात दाखल झाले आणि काही काळ तेथे कार्यरत राहिले.

तीन वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर त्यांनी ठरवलं की, आपल्या जीवनाचा उद्देश गीत लिहिणे आहे, बंदूक चालवणे नाही. आपल्या चित्रपट कारकिर्दीत बक्षी यांनी 4000 हून अधिक गाणी लिहिली. 1957 मध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लिहिण्याची संधी मिळाली. मात्र ते गीत इतकं प्रसिद्ध झालं नाही. यानंतर 1963 मध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना आपला चित्रपट 'मेंहदीं लगे मेरे हाथ' मध्ये गीत लिहण्याची संधी दिली. या चित्रपटाचे गीत इतके लोकांना आवडले की, त्यानंतर यशाने आनंद बक्षी यांची साथ कधीच सोडली नाही.

'आराधना', 'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' सारखे चित्रपट आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीला मैलाचा दगड ठरले. याच चित्रपटातील गीतांच्या जोरावर राजेश खन्ना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार बनले. आनंद बक्षी यांनी चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढ्यांसोबत काम केलं. काळानुसार त्यांच्या गीतांचे शब्द आणि टोन बदलत राहिला हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता.

वर्ष 1965 मध्ये 'जब जब फूल खिले' प्रदर्शित झाला, तेव्हा त्यांची 'परदेसियों से न अंखियां मिलाना', 'ये समां.. समां है ये प्यार का', 'एक था गुल आणि एक थी बुलबुल' ही गाणी खूप गाजली. यानंतर चित्रपटसृष्टीत हिट गीतांची गॅरंटी म्हणजे आनंद बक्षी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचे अनेक गीत आजही प्रेक्षांच्या आपल्या मनाचा ठाव घेत आहेत.

संबंधित बातम्या: 

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

‘ऑपरेशन सिंदूर’ मोठ्या पडद्यावर येणार; दिग्दर्शकाची घोषणा, निष्पाप आया-बहिणींचं कुंकू पुसल्याचा थरार
‘ऑपरेशन सिंदूर’ मोठ्या पडद्यावर येणार; दिग्दर्शकाची घोषणा, निष्पाप आया-बहिणींचं कुंकू पुसल्याचा थरार
"प्रॉपर्टी माझ्या नावावर कर!” झोपडपट्टीत राहणाऱ्या इन्फ्लुएन्सरच्या घरी जाताच फराह खान रोस्ट, व्हिडिओ तुफान व्हायरल
'खरं बोललं तर यांना टोचेल..' लग्नात न आलेल्या 'जवळच्या' लोकांविषयी पहिल्यांदाच बोलला सुरज चव्हाण; म्हणाला..
'खरं बोललं तर यांना टोचेल..' लग्नात न आलेल्या 'जवळच्या' लोकांविषयी पहिल्यांदाच बोलला सुरज चव्हाण; म्हणाला..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा अपघात, कोकणात बाईक स्कीड झाली अन्... VIDEO करत म्हणाला...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा अपघात, कोकणात बाईक स्कीड झाली अन्... VIDEO

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
Embed widget