एक्स्प्लोर

कोरोनानंतर मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांचं काय? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय?

कोरोनानंतर मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मालिकांचं भविष्य काय असणार आहे? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असणार आहे? या मुद्द्यावर एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते नितीन वैद्य यांनी सहभाग घेतला.

मुंबई : कोरोनामुळं सर्वच क्षेत्रात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. यातून मनोरंजन क्षेत्र देखील सुटलेलं नाही. कोरोना काळात आणि कोरोनानंतर मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मालिकांचं भविष्य काय असणार आहे? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असणार आहे? या मुद्द्यावर एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते नितीन वैद्य यांनी सहभाग घेतला. मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट- दिग्दर्शक महेश मांजरेकर मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट, कोरोनावर लस येईपर्यंत थांबण्यात काही अर्थ नाही, असं मत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, लोकं थिएटरमध्ये येणार आहेत का? याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सध्या सर्व नियमांचं पालन करुन शूटिंग सुरु आहे. आपल्याला हिंदीकडून मोठं आव्हान आहे. साऊथला तसं नाही. मराठी माणसं मराठी सिनेमे पाहात नाहीत, तर मग आपण करायचं काय? असा सवाल मांजरेकर यांनी केला आहे. सिनेमा चालायचा असेल तर प्रेक्षक येणं गरजेचं आहे. लोकांची मानसिकता बाहेक पडून सिनेमा पाहण्याची तयार व्हायला खूप वेळ लागणार आहे. अभिनेत्यांनाही आता आपल्या मानधनाची किंमत कमी करणं गरजेचं आहे. कारण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी हाती येतंय हे महत्वाचं आहे, असं मांजरेकर म्हणाले. नाट्यनिर्मात्यांना काही सूट द्यावी- प्रशांत दामले मनातील भीती दूर होणं गरजेचे आहे. नाटक सुरु करण्यासाठी आपल्याला संपूर्ण काळजी घ्यावी लागणार. नाट्यगृह सॅनिटाईज करणं, स्वच्छता राखणं या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. नाटकांची गणितं वेगळी, जोवर हे सगळं व्यवस्थित होत नाही तोवर नाटकं सुरु होणं कठिण आहे, असं अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे. पुढच्या जूनपर्यंत नाटकांचं गणित रुळावर येणं कठिण आहे. नाटकाला जगवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असं प्रशांत दामले म्हणाले. कलाकारांनी मानधन घेताना किंवा जाहिरातदारांनी आपल्या किमतींबाबत विचार करावा, असं देखील ते म्हणाले. तसेच नाट्यगृहांसाठी देखील महापालिका किंवा त्याच्या मालकांनी सूट द्यावी, असं ते म्हणाले. हजारच्या जागी तीनशे ते चारशेच लोकं नाट्यगृहात बसू शकतील, त्यामुळं काही सूट द्यायला हवी, असं प्रशांत दामले म्हणाले. मालिकांसाठी वेबसिरीज हे आव्हान नाहीच -  नितीन वैद्य  यावेळी बोलताना निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर मालिकांचं शूटिंग सुरु आहे. 85 मालिकांचं शूटिंग सुरु आहे. जवळपास 10 हजार लोकांना काम मिळालं. आपलं कुटुंब मानून सर्व काळजी घेत काम सुरु आहे. यामुळं अर्थकारण देखील सुरु झालं आहे, असं निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितलं आहे. अर्थकारणावर नक्की परिणाम झाला. जाहिरातींचं बजट शून्यावर गेलेलं. 33 टक्के कामगार आणि कलाकारांचं वेतन कपात झालं नाही तर उरलेल्या लोकांना देखील जवळपास सर्व निर्मात्यांनी काही ना काही रक्कम वेतन म्हणून दिली, असं वैद्य म्हणाले. आता नव्याने शूटिंग सुरु करताना सर्व निर्मात्यांनी आणि वाहिन्यांनी सर्व कलाकार तसेच सहकाऱ्यांचे विमे उतरवले आहेत. मराठी मालिकांचे प्रेक्षक कमी झालेले नाहीत, खूप कमी लोकच वेब सिरीज पाहतात, म्हणून मालिकांसाठी वेबसिरीज हे आव्हान नाहीच, निर्माते नितीन वैद्य यांचं मत . टिव्ही मालिकांच्या भागांची संख्या भविष्यात कमी करावी लागेल. चांगल्या कथा, कन्सेप्ट आणाव्या लागतील. कारण प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. आणि तसे बदल मालिकांमध्ये होत आहेत. दैनंदिन मालिकांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावू शकतं हे जाहिरातदारांना देखील कळलंय. मात्र मालिकांनी लांबी कमी करणं गरजेचं आहे, त्याकडे आता मालिका विश्व गांभीर्याने पाहात आहे, असं देखील नितीन वैद्य म्हणाले. हे ही वाचा कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही वेळ नाही : राज ठाकरे राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस कोरोनामुळं उद्योजकांचं मोठं नुकसान, लवकरच विशेष पॅकेजची घोषणा : उद्योगमंत्री सुभाष देसाई Majha Maharashtra Majha Vision | हे लिव्ह-इन रिलेशनशिप आहे, कुटुंब वगैरे नाही, त्यामुळे हे सरकार टिकेल असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस  Majha Maharashtra Majha Vision 2020 | आरोग्य विभागातील सगळ्या रिक्त जागा भरणार : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
MI Jinkun Ghein Sara:'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget