एक्स्प्लोर

बाहुबली बनवणारे राजमौली कोण?

मुंबई : प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता ताणून धरलेला 'बाहुबली 2' अर्थात 'बाहुबली द कन्क्ल्युजन' रिलीज झाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना भव्यता आणि भारदस्तता पाहायला मिळाली. बाहुबली सिनेमाचा पहिला भाग दीडवर्षापूर्वी रिलीज झाला. तेव्हापासून प्रेक्षक बाहुबलीच्या दुसऱ्या भागाची चातकाप्रमाणे वाट पाहात होते. सिनेक्षेत्रात सर्वाधिक चर्चिला गेलेला, उत्सुकता ताणून धरलेला सिनेमा म्हणून बाहुबलीकडे पाहता येईल. कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने देशवासियांची उत्सुकता वाढली होती. हीच उत्सुकता वाढवणारा दिग्दर्शक म्हणजे के राजामौली होय. कोण आहे के राजामौली? जर तुम्ही 'मगाधीरा' आणि 'ईगा' हे दोन सिनेमे पाहिले असाल, तर बाहुबली बनवणारा कोण असू शकेल, याचा अंदाज बांधू शकाल. 43 वर्षीय राजामौली यांनी 2015 मध्ये 'बाहुबली द बिगनिंग' हा सिनेमा बनवला होता. हा सिनेमा केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारत आणि परदेशातही गाजला. या सिनेमावरुनच राजमौली यांनी आपण बॉलिवूडलाही फाईट देत असल्याचं दाखवलं होतं. 'बाहुबली 2' या सिनेमाने पहिल्याच दिवशी 121 कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. इतकंच नाही तर सलमान, आमीर आणि शाहरुख या खान मंडळीचा विक्रम बाहुबलीने मोडला. बाहुबली 2 हा सिनेमा एकाचवेळी तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. फिल्मी दुनिया वारसाहक्कामध्ये एस एस राजामौली यांना घरातूनच फिल्मी दुनियेचा वारसा मिळाला. त्यांचे वडील विजयेंद्र प्रसाद टॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक (स्क्रिप्ट रायटर) आहेत. राजामौली यांचा जन्म कर्नाटकातील रायचूरमध्ये 10 ऑक्टोबर 1973 रोजी झाला. जन्म कर्नाटकचा असला तरी राजामौली हे आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोवूर शहरातील आहेत. राजमौली यांनी चौथीपर्यंतचं शिक्षण कोवूरमध्येच पूर्ण केलं. त्यानंतर ते बारवीपर्यंत एलूरमध्ये शिकले. त्यांचे वडील आणि भाऊ सिनेसृष्टीशीच संलग्न होते. त्यामुळे आपसूकच राजामौलींचाही ओढा सिनेजगताकडेच होता. राजामौली यांनी कोटागिरी वेंकटेश्वर राव यांचे सहाय्यक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ते दिग्दर्शक राघवेंद्र राव यांचेही असिस्टंट होते. राघवेंद्र यांच्यासोबत राजामौली यांनी शांती निवासम टीव्ही मालिकेत काम केलं. सुरुवातीच्या काळात राजामौली यांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपल्या कामात छाप पाडली. ज्या ज्या दिग्दर्शकांसोबत राजामौली यांनी काम केलं, ते-ते सर्व भारावून गेले. राजामौली यांनी 2009 मध्ये 'मगाधीरा' आणि 2012 मध्ये 'ईगा' हे सिनेमे बनवले. या दोन सिनेमांनी राजामौली यांना ओळख दिली. सिनेसृष्टीत राजामौली हे नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. 'मगाधीरा' या सिनेमाची संपूर्ण देशाने वाहवा केली. मग 2015 साल उजाडलं आणि राजामौली यांनी बाहुबली बनवून, टॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडचीही रुळलेली सर्व समीकरणं उधळून लावली. 'बाहुबली'ने राजामौली यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. राजामौली हे बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' बनले! बाहुबली हा जगभरात 650 कोटी कमावणारा पहिला दक्षिण भारतीय, आणि हिंदीत डब करुन 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला. जिथे बाहुबलीने बॉलिवूडचे रेकॉर्ड मोडले, तिथे टॉलिवूड किंवा तेलुगू सिनेमांचं काय? तेलुगू सिनेसृष्टीत बाहुबलीने इतिहास रचला. बाहुबली 2: द कन्क्लुजन या सिनेमाने तर रिलीज आधीच सॅटलाईट आणि प्रसारण हक्काच्या विक्रीतून तब्बल 5 अब्ज अर्थात 500 कोटी रुपये कमावले आहेत. आता 28 एप्रिल 2017 रोजी हा सिनेमा जगभरात 9 हजार स्क्रिनवर रिलीज झाला आहे. पुरस्कार राजामौली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तीन फिल्म फेयर अॅवॉर्ड, नंदी अवॉर्ड, IIFA आणि स्टार वर्ल्ड इंडियाचा एंटरटेनर ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार राजामौली यांना मिळाले. 2016 मध्ये राजामौली यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actress Divorce: 'घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही, कारण...' 14 वर्षांचा संसार मोडला, 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
'घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही, कारण...' 14 वर्षांचा संसार मोडला, 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
Picture Boys Upcoming Movie: खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या मुलाची मेहनत फळाला; आधी वेब सीरिज अन् आता थेट सिनेमात झळकणार
खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या मुलाची मेहनत फळाला; आधी वेब सीरिज अन् आता थेट सिनेमात झळकणार
Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
Shakti Mohan On Marriage, Motherhood: चाळीशी गाठूनही बॉलिवूड 'ही' प्रसिद्ध कोरिओग्राफर लग्नापासून पळतेय दूर; म्हणाली, 'स्वतःचं मूलंही नकोय...'
40 वर्षांची 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर करणार नाही लग्न; म्हणाली, 'स्वतःचं मूलंही नकोय...'

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Embed widget