एक्स्प्लोर

कॅनडियन नागरिक अक्षय कुमारकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घेतला जाणार?

परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे

मुंबई : अक्षय कुमारने आपल्या कॅनडियन नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र आहे की नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अक्षयकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा का, असा सवाल काही नेटिझन्स विचारत आहेत. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रुस्तम' चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार काढून घेण्याची मागणी काही जणांनी केली आहे. दरम्यान, परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या नियमावलीचा फोटो ट्वीट करत ढोलकियांनी अक्षयची पाठराखण केली आहे. लेखक अपूर्व असरानी यांनी ट्विटरवरुन अक्षय पुरस्कारास पात्र नसल्यास काय पावलं उचलणार? असा सवाल विचारला होता. त्यावर्षी 'अलिगढ' चित्रपटात मुख्य भूमिका करणारा मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रबळ दावेदार होता, याकडे असरानींनी लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अक्षय कुमार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अक्षय कुमारने लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यामुळे अनेक जणांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. अक्षयने ट्विटरवरुन आपल्या नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिलं. 'माझ्या नागरिकत्वाविषयी अकारण होणाऱ्या चर्चेचं कारण मला समजतच नाही. माझ्याकडे कॅनडियन पासपोर्ट असल्याचं मी कधी नाकारलं नाही, लपवलंही नाही. मी गेल्या सात वर्षांत कॅनडाला गेलोही नाही' असंही अक्षय म्हणाला. 'मी भारतात काम करतो. भारतात सर्व कर भरतो. इतक्या वर्षांत मला भारताविषयीचं प्रेम सिद्ध करण्याची आवश्यकताच नव्हती. माझ्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार वाद निर्माण करणं क्लेशदायी आहे. हा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय मुद्दा असून त्याचा कोणावरही परिणाम होत नाही' असंही अक्षय पुढे म्हणाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Embed widget