एक्स्प्लोर

कॅनडियन नागरिक अक्षय कुमारकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घेतला जाणार?

परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे

मुंबई : अक्षय कुमारने आपल्या कॅनडियन नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र आहे की नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अक्षयकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा का, असा सवाल काही नेटिझन्स विचारत आहेत. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रुस्तम' चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार काढून घेण्याची मागणी काही जणांनी केली आहे. दरम्यान, परदेशी तंत्रज्ञ आणि कलाकारही भारतातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यास पात्र आहेत, अशी माहिती दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या नियमावलीचा फोटो ट्वीट करत ढोलकियांनी अक्षयची पाठराखण केली आहे. लेखक अपूर्व असरानी यांनी ट्विटरवरुन अक्षय पुरस्कारास पात्र नसल्यास काय पावलं उचलणार? असा सवाल विचारला होता. त्यावर्षी 'अलिगढ' चित्रपटात मुख्य भूमिका करणारा मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रबळ दावेदार होता, याकडे असरानींनी लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अक्षय कुमार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अक्षय कुमारने लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यामुळे अनेक जणांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. अक्षयने ट्विटरवरुन आपल्या नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिलं. 'माझ्या नागरिकत्वाविषयी अकारण होणाऱ्या चर्चेचं कारण मला समजतच नाही. माझ्याकडे कॅनडियन पासपोर्ट असल्याचं मी कधी नाकारलं नाही, लपवलंही नाही. मी गेल्या सात वर्षांत कॅनडाला गेलोही नाही' असंही अक्षय म्हणाला. 'मी भारतात काम करतो. भारतात सर्व कर भरतो. इतक्या वर्षांत मला भारताविषयीचं प्रेम सिद्ध करण्याची आवश्यकताच नव्हती. माझ्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार वाद निर्माण करणं क्लेशदायी आहे. हा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय मुद्दा असून त्याचा कोणावरही परिणाम होत नाही' असंही अक्षय पुढे म्हणाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!

व्हिडीओ

Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report
Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
Share Market : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये भारतीय बाजारातून 2 लाख कोटी काढून घेतले, सर्वाधिक फटका 'या' क्षेत्रांना
FII नं 2025 मध्ये भारतीय बाजारातून 2 लाख कोटी काढून घेतले, सर्वाधिक फटका 'या' क्षेत्रांना, जाणून घ्या
तिकडे अमेरिकेची तैवानला शस्त्र पुरवण्याची घोषणा, इकडून चीनचा दणका, 20 अमेरिकन कंपन्यांवर बंदी, मालमत्ता गोठवली
चीनचा जोरदार धक्का, अमेरिकेच्या  20 कंपन्यांवर घातली बंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
Meenakshi Shinde: ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget