एक्स्प्लोर

‘एक देश, एक निवडणूक’ला माझाही पाठिंबा : रजनीकांत

‘एक देश, एक निवडणूक’ला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत सुपरस्टार रजनीकांत यांनी एकत्र निवडणुका घेण्यास पाठिंबा दिला आहे. एकत्र निवडणुका झाल्यास पैसे आणि वेळ वाचण्यास मदत होईल, असेही रजनीकांत म्हणाले.

चेन्नई (तामिळनाडू) : ‘एक देश, एक निवडणूक’ला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत सुपरस्टार रजनीकांत यांनी एकत्र निवडणुका घेण्यास पाठिंबा दिला आहे. एकत्र निवडणुका झाल्यास पैसे आणि वेळ वाचण्यास मदत होईल, असेही रजनीकांत म्हणाले. याआधीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, तसेच दस्तुरखुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यावर विचार व्हायला हवा, असे वक्तव्य केले होते. राष्ट्रपती काय म्हणाले होते? 29 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी केलेल्या अभिभाषणात म्हटले होते, “देशाच्या प्रत्येक भागात सुरु असलेल्या निवडणुकांमुळे त्याचा शासन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. सलगच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शिवाय, निवडणुकांच्या निमित्ताने आचार संहिता लागू होण्याने विकासाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासंदर्भात सर्वांनी, गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. तसेच यावर सर्व पक्षांचं एकमत व्हावं,” निवडणूक आयोगही तयार ऑक्टोबर 2017 मध्ये भोपाळमधील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यास आम्ही सज्ज आहोत, असे म्हटले होते. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला तशी माहितीही दिली होती. एकत्र निवडणुका घ्यायच्या असल्यास आणखी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सची गरज भासेल. ईव्हीएमसाठी 3  हजार 4 कोटी, तर व्हीव्हीपॅटसाठी 12 हजार कोटी रुपयांची गरज लागेल, असेही निवडणूक आयोगाने केंद्राला कळवले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी जवळपास 40 लाख ईव्हीएम आणि अँडरटेकिंग्जची गरज असल्याचेही आयोगाने सांगितले. सतत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम सरकारी कार्यप्रणालीवर होतो. शिवाय देशावर आर्थिक ताण पडतो. त्यामुळे निवडणुका एकत्र घेण्यावर जोर दिला जात आहे. संबंधित बातम्या : मोदी-शाहा धक्का देणार, लोकसभा निवडणुका 2018 मध्येच घेणार? ‘लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी एकमत व्हावं’
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: 'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget