एक्स्प्लोर

Happy Birthday Nagarjuna : बालकलाकर म्हणून केली करिअरची सुरुवात, आता साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो नागार्जुन!

Nagarjuna Birthday : अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna Akkineni) दाक्षिणात्य तसेच, हिंदी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज (29 ऑगस्ट) नागार्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Nagarjuna Birthday : अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna Akkineni) दाक्षिणात्य तसेच, हिंदी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज (29 ऑगस्ट) नागार्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे. नागार्जुन अक्किनेनी हे साऊथ इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. नागार्जुन यांचा जन्म 29 ऑगस्ट 1959 रोजी चेन्नई येथे झाला. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच, नागार्जुन एक चित्रपट निर्माते आणि उद्योगपती देखील आहेत. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर देखील प्रसिद्ध अभिनेते होते. चित्रपट विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील असल्याने नागार्जुन यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्वाची ओढ होती. अगदी लहान वयातच त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

नागार्जुन यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. नागार्जुनने दीर्घकाळ बालकलाकार म्हणून काम केले. बालकलाकार म्हणून त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. नागार्जुन अक्किनेनी यांनी ‘विक्रम’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांचा हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. याच वर्षी नागार्जुन यांनी ‘कॅप्टन नागार्जुन’ आणि ‘अरण्यकांड’ या त्यांच्या दोन चित्रपटांमध्येही काम केले. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर नागार्जुनने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभ्यासातही हुशार!

मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असतानाही अभिनेत्याने अभिनयापेक्षा अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी नागार्जुन (Nagarjuna Akkineni)  यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लुईझियाना, लाफायेटमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

दोन वेळा बांधली लग्नगाठ!

1984 मध्ये, अक्किनेनी नागार्जुनने चित्रपट निर्माते डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबतीशी विवाह केला, दोघांनाही नागा चैतन्य नावाचा मुलगा आहे. नागार्जुन आणि लक्ष्मीचे लग्न फार काळ टिकले नाही. तब्बल 6 वर्षांनी दोघांनी 1990 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमला अक्किनेनीशी लग्न केले, दोघांनाही एक मुलगा अखिल अक्किनेनी आहे. नागार्जुन यांचे दोन्हीही मुलगे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात सक्रिय झाले आहेत.

तब्बू अन् नागार्जुन यांच्या प्रेमाची चर्चा!

काही वर्षांपूर्वी नागार्जुन (Nagarjuna Akkineni) सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. एका चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नागार्जुनचे लग्न झाले होते. पण, तरीही दोघांचे अफेअर सुरूच होते. दोघेही जवळपास 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नागार्जुन यांचे तब्बूवर प्रेम होते, पण त्यांना त्यांचे लग्नही मोडायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी तब्बूशी लग्न केले नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

हेही वाचा :

The Ghost Teaser : नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही झाले स्तब्ध!

Brahmastra Nagarjuna Look : ‘अंधकार भी थर थर कांपे’, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील नागार्जुनचा जबरदस्त लूक पाहिलात का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: 'हा गोळीबार म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न...'; सलमान खानच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाला?
'हा गोळीबार म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न...'; सलमान खानच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाला?
Nasrapur: पुण्यातील नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखचा संताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण, म्हणाला..
पुण्यातील नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखचा संताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण, म्हणाला..
'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
Sharad Ponkshe: 'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी

व्हिडीओ

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget