एक्स्प्लोर

सुजयने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक : राधाकृष्ण विखे पाटील

मला अद्याप पक्षाची नोटीस मला मिळाली नाही, नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडण्यावर भाष्य करू, असेही ते म्हणाले.

अहमदनगर : साडेचार वर्ष पक्षासाठी मेहनत घेतल्यानंतर शेवटच्या क्षणी जागा सोडण्यावरून राजकारण झाले. निवडून येण्याची शक्यता असल्याने सुजयसाठी तिकीटाची मागणी केली होती. मात्र आमच्याच पक्षातील नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली. यासंदर्भात दिल्लीला झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी म्हणतेय तर सुजयने राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक होतं, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक झाल्यानंतर कार्यकत्यांची बैठक घेणार असून राज्यातील कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर राजकीय भूमिका ठरवणार असल्याचे ते म्हणाले तोवर पाण्याच्या  प्रश्नावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला अद्याप पक्षाची नोटीस मला मिळाली नाही, नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडण्यावर भाष्य करू, असेही ते म्हणाले. अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी माझा आग्रह होता. त्यावेळी राष्ट्रवादी जागा सोडायला तयार होती. मात्र सुजयने राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं राष्ट्रवादीकडून सांगितलं गेलं. राहुल गांधीनी देखील राष्ट्रवादीकडून उभे राहण्याची सूचना केली, हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाला असं सुचवतात. मागे उभे राहण्याऐवजी त्यांनी ही सूचना केल्याने धक्का बसला. साडेचार वर्षाच्या कामाचे फलित हेच का? असा सवाल विखे पाटील यांनी केला. विखे पाटील म्हणाले की, एवढी वर्ष पक्षासाठी तन मन धनाने काम केलं. प्रत्येक वेळी काँग्रेस कार्यकत्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्नाच्या वेळी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लढलो.  याचा फायदा पक्षाला झाला निवडणुकांच्या निकालात झालेला दिसून आला. माझ्यामुळे सरकारला कर्जमाफी मिळाली. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळो लावून धरले, लोकहिताच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवला असल्याचे विखे पाटील म्हणाले. राजीनामा देण्यासंबंधात १५ मार्चला राहुल गांधींना मी पत्र पाठवलं. काहीतरी नैतिकता ठेवावी म्हणून सुजय भाजपत गेल्यावर विरोधी पक्षनेते पदावर राहणे योग्य नाही, असं ठरवून हा निर्णय मी घेतला.  डॉ . सुजयच्या प्रचाराला जायचं नाही हे देखील ठरवलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची आमच्याविषयीची भावना काय ते शरद पवारांच्या वक्तव्यावरून दिसून आलं होतं. आम्ही राजकीय आत्महत्या करायची होती का?, असं विखे यावेळी म्हणाले. पवारांच्या मनात पूर्वग्रहदूषित भावना होती, बाळासाहेब विखेंबद्दलच त्यांचं विधान वेदनादायी होतं, शेवटी व्यक्तिगत पातळीवर निवडणूक आल्याने मुलाच्या पाठीमागे उभे राहिलो, असेही ते म्हणाले. विधिमंडळ पक्षाचा नेता असूनही पक्ष माझ्या मागे उभा राहिला नाही, याच शल्य आहे. मी काँग्रेसचा स्टार प्रचारक होतो. मात्र प्रचाराला गेल्यावर राष्ट्रवादीचे लोक बहिष्कार घालतील आणि म्हणून त्या उमेदवाराचं नुकसान होऊ नये म्हणून प्रचारक असतानाही प्रचाराला गेलो नाही, असेही विखे पाटील म्हणाले. काही घडलं तर ती विखेंचीच चूक हे काही काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर बिंबवलं. मला राजीनामा मंजूर केला याच दुःख नाही. मी पक्षाला गालबोट लागेल असं काही केलं नाही, तडजोडी केल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत मैत्रीची अफवा उठवली गेली, त्यांचा मी व्यक्तिगत फायदा कधीच घेतला नाही, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Mamata Banerjee : पराभूत झालेले नाही, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, राजभवनात जाणार नाही, ममता बॅनर्जींचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
सोनिया गांधी, उद्धव ठाकरे ते हेमंत सोरेन यांचा फोन आलेला, अखिलेश यादव उद्या बंगालमध्ये, ममता बॅनर्जींनी अपडेट दिली 
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
Who is Kalita Maji : दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget