एक्स्प्लोर

सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास ते सुरक्षित राहण्याची हमी आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ठेवलेल्या पैशांवर व्याज दिले जाते. त्यामुळे तुम्ही ठेवलेल्या ठेवीवर चांगला परतावा मिळतो.

मुंबई : स्वत:कडे असलेले पैसे गुंतवून त्याचे मूल्य आणखी वाढवण्यासाठी लोक शेअर मार्केट (Share Market), म्यूच्यूअल फंड (Mutual Fund) यांचा आधार घेतात. मात्र अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीला जोखीमही असते. त्यामुळे तुम्हाला कोणताही धोका न पत्करता चांगल्या परताव्याची हमी पाहिजे असेल, तर सरकारच्या वेगवेगळ्या योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेची माहिती देणार आहोत. 

पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना

ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. (Post Office Saving Scheme) आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही ठेवलेल्या ठेवींवर थेट 80,000 रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी पैसे भरण्याची गरज नाही. तुमच्या पगारातून उरलेले पैसे तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेच्या अंतर्गत तुम्ही जमा केलेल्या पैशांवर वर्षाला सध्या 6.7 टक्के व्याज मिळते. या योजनेअंतर्गत कोणताही नागरिक पैसे गुंतवून फायदा मिळवू शकतो. या योजनेची मॅच्यूरिटी ही पाच वर्षे आहे.

छोट्या मुलीच्या नावावरही खोलू शकता खातं

या योजनेत प्रत्येक महिन्याला पैसे गुंतवता येतात. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही गुंतवलेले पैसे बुडण्याचाही धोका नाही. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 100 रुपये गुंतवावे लागतात. जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यावर या योजनेत कोणतेही बंधन नाही. अल्पवयीन मुलांच्या नावावरही या योजनेअंतर्गत खातं खोलता येतं. अशा स्थितीत आई-वडिलांची कागदपत्रे जमा करावी लागतात.

80 हजार रुपयांचं व्याज कसं  मिळणार?

पोस्‍ट ऑफिसच्या आरडीमध्ये (Post Office RD) तुम्ही 7000 प्रतिमहिना गुंतवल्यास पाच वर्षांत तुमचे एकूण 4,20,000 रुपये जमा होतात. पाच वर्षांत मॅच्यूरिटी झाल्यावर तुम्हाला तुम्ही जमा केलेल्या पैशांवर  79,564 रुपये व्याज मिळते. म्हणजेच पाच वर्षांत तुम्हाला 4,99,564 रुपये मिळतात. तुम्ही प्रतिमहिना पाच हजार रुपयांची आरडी केल्यास एका वर्षात तुमचे एकूण 60,000 रुपये जमा होतात. पाच वर्षांत तुम्ही जमा केलेली रक्कम 3 लाख रुपये होते. त्यावर तुम्हाला 6.7 टक्के व्याज मिळते. म्हणजेच तुम्ही जमा केलेल्या तीन लाख रुपयांवर पाच वर्षांत तुम्हाला 56,830 रुपये व्याज मिळते. पाच वर्षांनंतर तुम्हाला एकूण 3,56,830 रुपये मिळतात. 

टीडीएस कापला जाणार

पोस्‍ट ऑफिसच्या आरडी स्‍कीमअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जातो. आरटीआय भरल्यावर तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला हा टीडीएस परत दिला जातो. या व्याजावर 10 टक्के टीडीएस लागू होतो. तुम्ही जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल तर टीडीएस कापला जाईल.

हेही वाचा :

...तर तुम्हीही झाले असते करोडपती, चार वर्षांत 'या' कंपनीनं अनेकांना केलं मालामाल!

मुकेश अंबानींच्या नव्या कोऱ्या कंपनीचा बोलबाला, वर्षात कमवाला तब्बल 310 कोटींचा नफा!

तयारीला लागा! लवकरच येणार 'या' कंपनीचा आयपीओ, भरघोस पैसे कमवण्याची नामी संधी!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget