एक्स्प्लोर
छत्रपती शिवाजीराजे - न्यायदक्ष प्रजाहितवादी शासक
हिरोजी आपल्याला खूप जवळचे आहेत त्यांनी विकत घेतलेली पाटीलकी आपण कशी काढून घ्यावी असा दुबळा विचार राजांनी केला नाही, मंडाजी निगडे यास त्याचा मूळ हक्क दिला, मल्हार निगडेवर कारवाई करताना त्याची देशमुखी काढून घेतली आणि रयतेच्या खजिन्यात अनामत जमा केली.

सोबतच्या पत्रात शिवाजी राजांनी एक अद्भुत निर्णय केला आहे. सर्रास दृष्टीस पडतं की एखाद्यानं जीवापाड मेहनत करुन आपल्यासाठी अजरामर कृती निर्मिली असेल तर त्याच्या समर्थनार्थ, त्याच्याकडून कळत नकळत काही चुका त्रुटी झाल्या तर त्याकडे कानाडोळाच होतो. ही वृत्ती सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे. शिवाजीराजे त्याला अपवाद आहेत.
हिरोजी इदलकर आणि रायगड यांचं नातं मायलेकरासारखं! हिरोजींनी आपलं सर्वस्व पणाला लावून जीवापाड मेहनत करुन रायगड घडवला हे सर्वश्रुत आहेच. 6 जून 1674 रोजी जेव्हा शिवबांचा राज्याभिषेक झाला तेव्हा छत्रपतींचा हिरोजींशी झालेला संवाद इतिहासात अजरामर झाला. त्याचीच फलश्रुती म्हणून रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरास असणाऱ्या पायरीवखाली ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इदलकर’ हा शिलालेख दिसतो.
तर त्या स्थापत्यप्रभू हिरोजींनी कीकवी (आताचे मु.पो.किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे) या गावची पाटीलकी मल्हार निगडे देशमुख यांच्याकडून विकत घेतली. वस्तुतः ती पाटीलकी मंडाजी निगडे यांची होती. मल्हारजीने मंडाजीच्या परस्पर ही पाटीलकी हिरोजींना विकली होती. ही माहिती मिळताच शिवाजीराजांनी हिरोजींना ती पाटीलकी परत करण्यास फर्मावले.
मल्हार निगडेने पाटीलकी विकून हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत द्यायला लावली. शिवाय मंडाजी निगडे यास त्याची पाटीलकी पुन्हा बहाल केली. याहीपुढे जाऊन महाराज आणखी अचूक व संपूर्ण न्याय केला - हा व्यवहार केल्याबद्दल मल्हारजीची देशमुखी काढून घेतली, त्याला त्या जबाबदारीतून मोकळं केलं. देशमुखीच्या बदल्यात त्याने भरलेली अमानत रक्कम देखील जशीच्या तशी(बजिन्नस) दप्तरदखल करुन घेतली. त्याचा करार रद्द केला.View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















