एक्स्प्लोर

BLOG : सुख आणि दुःख एकाच वेळेस अनुभवणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

BLOG : सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला राज्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. पण शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ धरली. अर्थात यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फार मोठा हात आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच द्यायचे नक्की झाल्यानंतर शिवसेनेतील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री केले तर राजकारणात बरेच काही घडू शकते याची जाणीव झाल्याने शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदी बसण्याची गळ घातली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या इतिहासात ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसली. तसे पाहिले तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत राजकीय वाटचाल सुरु केलीच होती.

मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्री आणि सेनाभवन येथे अनेक वेळा भेटी आणि गप्पा झाल्या होत्या. सेनाभवनवर तर पत्रकार परिषदेनंतर दालनात त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पाही होत. एकदा त्यांनी राजकीय वाटचालीबाबत बोलताना सांगितले होते. वेडात दौडले वीर मराठे सात तुम्ही ऐकले असेल. पण ते वेडात दौडले म्हणून दुश्मनांच्या तावडीत सापडले. आम्ही वेडात दौडणार नाही. नंतर त्यांच्या या वक्तव्याचा उलगडा झाला.

नागपूर अधिवेशनात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चांगल्या गप्पा होत. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच नागपूर अधिवेशनाला आले होते. मात्र नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जास्त गप्पा मारता आल्या नव्हत्या. याचे कारण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामटेकवर झालेली प्रचंड गर्दी. कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले असल्याने त्यांना बोलावयास वेळच मिळाला नव्हता. तसंच पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषवत असल्यानं अनेक गोष्टी जाणून घेण्यात त्यांचा वेळ जात होता.

हिवाळी अधिवेशन संपलं आणि लगेचच एक-दोन महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपलं. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यंदाच्या फेब्रुवारीत राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलं.

त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आले आणि त्यातच कोरोनाची साथ आली. कोरोनात सगळंच बंद असल्याने मंत्रालयात जाणे-येणे बंद झाले त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही भेटता आले नाही. त्यानंतर पावसाळ्यात पावसानं हाहाकार माजवला. दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनामुळे सगळं बंद, तिजोरीत ख़डखडाट आणि त्यातच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी द्यावा लागला. कोरोनावरील उपचारासाठी कोट्यवधींचा खर्च करावा लागला.

कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याच्या आजाराने ग्रासले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली पण त्यांच्या हालचालींवर निर्बंध आले. त्यामुळे यावेळच्या हिवाळी अधिवेशनात ते आजपर्यंत उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्री अधिवेशनात फक्त एक दिवस उपस्थित राहू शकतात अशी माहिती एका नेत्याने मागील आठवड्यातच दिली होती. सोमवार किंवा मंगळवारी ते अधिवेशनात उपस्थित राहतील असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात.

काल मात्र ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांचे दर्शन झाले. कोरोनाची साथ अजूनही गेलेली नाही. आता तर ओमायक्रॉनने हल्ला केलाय. रोज नवे निर्बंध लागू होतायत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले खरे पण त्यांनी कदाचित मुहूर्त चांगला निवडलेला नसावा. कारण मुख्यमंत्रीपदी आल्यापासून काही ना काही अडचणी येतच आहेत. मग त्या राजकीय असतील, नैसर्गिक असतील किंवा आरोग्याच्या असतील. खऱ्या अर्थाने त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा आनंद घेताच आलेला नाही. म्हणूनच सुरुवातीला म्हटले की सुख आणि दुःख एकाच वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनुभवायला मिळत आहे.

आई भवानी त्यांची प्रकृती लवकर ठीक करो आणि ते पुन्हा पूर्वीच्याच जोमाने कामाला लागोत हीच सदिच्छा.

(सोबतचा फोटो हा सेनाभवनातील आहे. मागील महापालिका निवडणुकीनंतर सेनाभवनातील आई अंबाबाईच्या दर्शनाला उद्धव ठाकरे सपत्नीक आले होते. त्यावेळचा मी काढलेला हा फोटो).


BLOG : सुख आणि दुःख एकाच वेळेस अनुभवणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Embed widget