एक्स्प्लोर

BLOG | कोरोना हारेगा, देश जीतेगा

नुकत्याच शासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 2916 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाबाधितांचा आकडा देशभर वाढत असताना, रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचा आकडा पण वाढत आहे ही आनंदाची बातमी आहे. देशात सध्या 10, 477 रुग्ण कोरोनाबाधित असून आतापर्यंत 1488 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेने कंबर कसली असून घरोघरी जाऊन रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व रुग्णांना उत्तम उपचार  मिळत आहेत. यामुळे कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला सगळ्यांनी एकत्र येऊन केला तर आपण लवकरच आपला देश कोरोनामुक्त होऊ शकतो.

 नुकत्याच शासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 2916 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी  सुमारे 295 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे.

नागरिक रोज कोरोनाबाधितांच्या रुग्ण वाढीची संख्या ऐकून सध्या कंटाळले आहेत. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधून केलेल्या संवादात कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यापासून ते 83 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले. गेल्या  महिन्यात 9 मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण  सापडले होते.पुण्यातील राहणाऱ्या या जोडप्याने 14 दिवस रुग्णालयात राहून यशस्वी उपचार घेतले आणि  23 मार्चला बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोनाच्या या सगळया कोलाहलात आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सतत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचं मनोबल वाढवत असून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. शासनाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 166, ठाणे मनपा 6, ठाणे ग्रामीण 3, कल्याण डोंबिवली 14, मीरा भाईंदर 2, नवी मुंबई 9, पनवेल 3, उल्हासनगर 1, वसई विरार 2, नागपूर 11, पुणे महापालिका परिसर 27, पिंपरी चिंचवड 12, पुणे ग्रामीण 4, अहमदनगर ग्रामीण 1, अहमदनगर महापालिका क्षेत्र 2, नाशिक ग्रामीण 1, रत्नागिरी 1, सिंधुदुर्ग 1, सांगली 25, सातारा 1, यवतमाळ 3 आणि गोंदिया 1 अशा एकूण 295 रुग्णांचा समावेश  आहे.

महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जारी केल्याला पत्रकात कोरोनाच्या या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढ कौतुक करावं तेवढ कमीच आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी,  एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असा जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहे. या अशा प्रकारामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त करून यामुळे लोकांचा कल या आजराची  लक्षण लपविण्याकडे राहील आणि लॉक डाउन सक्त केलेल्या सर्व उपाययोजना निष्प्रभ ठरतील. तसेच त्यांनी पत्रकात ह्या आजारावर मात  केलेल्याला रुग्णाच्या आकडेवारीच दर आठवड्याला एक न्युज बुलेटिन काढून राज्य आणि केंद्र सरकारने जारी करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी  केलेली ही  मागणी स्तुत्य असून यामुळे नागरिकांमध्ये सकारत्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

यामुळे नागरिकांनी न घाबरता कोणत्याही प्रकारची लक्षणं न लपविता वेळीच योग्य उपचार घेतले पाहिजे. देशातील सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केल्यास लवकरच कोरोनावर मात करून देश पूर्वस्थितीवर येईल. यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचं पालन केले पाहिजे.

   संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter  Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC  सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
Embed widget