एक्स्प्लोर

Ashadhi Ekadashi : पारावरच्या गप्पा : 'इठ्ठल हाय आपल्या पाठीशी'

Ashadhi Ekadashi : (आषाढी चा दिवस, काही मंडळी समाज मंदिरात बसलेली, तेवढ्यात कोतवाल दवंडी देतांना)

तुळश्या : आज आषाढीचा मोडा हाय र....!                                                                                                   दाम्या  : अय, तुळश्या दादा, समद्यासनी ठाव हाय, आज ईठ्ठला चा दिस हाय ते
धन्या : दाम्या, त्याच सांगन, काम हाय... 
रंग्या : अर, दाम्या तुका तात्या येणार हाईत का न्हाय...
दाम्या : येणार हाईत, न्याहारी करत असतील. 
मंग्या : लेकाहो, पाणी मातर, समद्या राज्यात चालू हाय गड्या 
रंग्या : व्हय तर, आता आवणीलाबी सुरवात झालीय म्हणा, फकस्त सुखान पड रे बाबा...                    

दाम्या : हाव गड्या मागल्या वरिस मोक्कार पाऊस झालता, कोल्हापूर, सांगली कड कसली भयानक परिस्थिती व्हती, औंदा नको बाबा अस..
धन्या : दाम्या, तुह्या जिभला काही हाड, चांगल्या दिसी अस वंगाळ बोलू नग...

(तेवढ्यात तुका पाटील येतो)                                                                                                                                                    संत्या : तुका तात्या आला वाटत... 
तुका पाटील : काय र पोराहो, जमले व्हय...
दाम्या : व्हय तात्या, तुमचीच वाट पाहत व्हतो? लय टाइम लागला...
तुका पाटील : अर न्याहारी करत व्हतो, हात धुतोच व्हतो की, इज्याच्या फोनवर शाळतल्या मास्तरचा फोन आला 
धन्या : काय म्हणला मास्तर...
तुका पाटील : आर, त्यो म्हणला पाटील, शाळेत काय पोर येत न्हाय, संख्याबी कमी झालीय. 
तुळश्या : मास्तराला म्हणावं पाणी केवढं झालंय नदीला, कस यायचं पोरांनी...

तुका पाटील : व्हय बराबर म्हणतुया.. दोन तीन जण जात्यात पण जीव जायाची भीती, एवढं नदी पार करण म्हंजी सोप्प काम न्हाय...
रंग्या : व्हय तर, म्या म्हणतो कशाला जीव धोक्यात घालावा, पोर चार महिने रातील घरी, त्यानं काय व्हतंय... 
दाम्या : शाळच व्हईल, कायतरी पर एखादं अर्जंट पेशंट आलं म्हंजी काय करायचं...
तुका पाटील : ते बी हाय म्हणा...पर कायतरी उपाय कराया लागलं, शिक्षण तर थांबाया नग, दवाखाना बी झाला पाहिजे...नदी वलांडायची म्हंजी...
दाम्या : खरंय, पाटील काहीतरी कराया हवं, पर्वा दिसी खालच्या आळीच्या तान्याच पोरगं पोरगं वाहून जाता जाता राहील...
तुका पाटील : त्याचमुळ, काहीतरी उपाय शोधायला नग, संत्या, त्या भग्याला अन वैभ्याला, बोलव बर इकडं... 

(संत्या फोन करून त्या दोघांना बोलावतो, दोघेही थोड्या वेळात येतात)                                                                                                                                                        

 वैभ्या : पाटील आम्हाला कशाला बोलवलं?                                                                                                                                            तुका पाटील : सांगतो, वाईस दम तर खाय, कुठं कामाला जातोस का? 
वैभ्या : हा जातोय की!
तुका पाटील : तू त घरीच असतोस की!
वैभ्या : म्हणजे काम चालुय पण घरूनच...
तुका पाटील : तुला पोरांना शिकवायला जमलं ना? 
वैभ्या : पोरांला, पण शाळा सुरू झाल्यात की आता
तुका पाटील : आर नदीला पूर आलाय, चार महिने असच चालू राहील तवा आपल्या गावातल्या पोरायला तू शिकवं

वैभ्या : चाललं की पण जागा ?
तुका पाटील : हांग अस, अर आपलं ईठ्ठलाच मंदिर हाय की!
भग्या : मग मला कशापाई बोलावलंय..?
तुका पाटील : भग्या, तुयावर लय मोठी जबाबदारी हाय, न्हाय म्हणू नग... पुण्याच काम हाय...
भग्या : सांगा की पाटील, गावासाठी आपण काहीही करू? 
तुका पाटील : नदीला पूर आलाय, आपल्या गावातल एखादं न्यायचं झालं तर तरास हाय, तुयाकड गाडी हाय, म्हणून ईचारल...
भग्या : व्हय करतो पाटील, कवाबी रातच्याला हाक मारा, मी हजर राहीन...
तुका पाटील : झालं त मग, दोन्ही काम व्हतील आता, पोर बी शिकतील अन दवाखान्याच काम बी व्हईल...ईठ्ठला तूच आलास र बाबा...                                                                                              

दाम्या : पाटील, झ्याक काम झालं बघा, पांडुरंग पावला म्हणायचा...                                                                                                                                              तुका पाटील : व्हय व्हय, गावात दिंडीचा कार्यक्रम हाय, चला पांडुरंगाचा गजर करू.....
(समदे जण इठ्ठलाच्या मंदिराकडे जातात)

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Embed widget