एक्स्प्लोर

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण का होते? दक्षिणायन म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व

Makar Sankranti 2023 : वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो. या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात

Makar Sankranti 2023 : हिंदू धर्मात सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे. सूर्य धनु राशीचा प्रवास थांबवून 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 08.46 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य उत्तरायण (Uttarayan) होईल. सूर्याच्या उत्तरायणावर सर्व प्रकारची शुभ कार्ये, यज्ञ-विधी, विवाह, आदी कार्ये सुरू होतील. शास्त्रानुसार सूर्याच्या उत्तरेकडे होणाऱ्या हालचालीला उत्तरायण आणि दक्षिणेकडे त्याच्या हालचालीला दक्षिणायन (Dakshinayan) म्हणतात. वैदिक शास्त्रानुसार उत्तरायण आणि दक्षिणायन ही सूर्याची स्थिती आहे. दरवर्षी 14 जानेवारीपासून सूर्य उत्तरायण काळात प्रवेश करतो.


उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?
हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो. या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी 6 महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, एका वर्षात सहा ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात.


हिंदू धर्मात उत्तरायण काळ शुभ
मकर संक्रांतीचा सण सूर्याच्या उत्तरायण काळात साजरा केला जातो. हिंदू धर्मात उत्तरायण काळ शुभ मानला जातो. उत्तरायण हा देवांचा दिवस म्हणतात. सूर्य उत्तरायण झाल्यावर सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण असताना गंगेत स्नानाला विशेष महत्त्व असते. गुजरात आणि महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण उत्तरायण या नावाने साजरा केला जातो तर उत्तर भारतात हा दिवस खिचडी म्हणून साजरा केला जातो.


उत्तरायण कालावधीचे महत्त्व
उत्तरायण म्हणजे उत्तरेकडे जाणे. हिंदू धर्मात जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा तो खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की, जेव्हा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो तेव्हा सूर्याची किरणे निष्प्रभ होतात, तर जेव्हा सूर्य पूर्वेकडून उत्तरेकडे जातो तेव्हा सूर्याची किरणे चांगली मानली जातात आणि आरोग्य प्रदान करतात. मकर संक्रांतीच्या सूर्याच्या उत्तरायणानंतर हवामान बदलू लागते. सूर्याच्या उत्तरायणानंतर शरद ऋतू मंद होऊन वसंत ऋतूची सुरुवात होते. उत्तरायणात रात्री लहान होतात आणि दिवस मोठे होतात. सूर्योदय होत असताना प्रमुख तीर्थक्षेत्रांवर गंगेत स्नान करण्याचे महत्त्व वाढते. याशिवाय उत्तरायणावर दान आणि पूजाचेही विशेष महत्त्व आहे.

 


ज्योतिषशास्त्रात उत्तरायणाचे महत्त्व
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. याशिवाय सूर्य दोन अयनांमध्ये बदलतो, ज्यांना उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. सूर्याचे दोन आयन 6-6 महिन्यांचे असतात. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या कालगणनेनुसार जेव्हा सूर्य मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हा या कालावधीला उत्तरायण काळ म्हणतात. दुसरीकडे, सूर्याचा कर्क राशीपासून धनु राशीपर्यंतच्या प्रवासाला दक्षिणायन म्हणतात. उत्तरायण काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायन ही देवतांची रात्र मानली जाते. उत्तरायणात शरीर सोडल्याने मोक्ष प्राप्त होतो. महाभारत काळात सूर्योदय होत असताना भीष्म पितामहांनी प्राणत्याग केला.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Makar Sankranti 2023 : यंदाची मकर संक्रांती 14 की 15 जानेवारी? तारखेबाबत संभ्रम, जाणून घ्या काय सांगितलंय शास्त्रात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hyderabad Liberation Day : सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलचं मालक कोण असतं? जाणून घ्या 
महाराष्ट्रात  पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hyderabad Liberation Day : सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलचं मालक कोण असतं? जाणून घ्या 
महाराष्ट्रात  पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा; पालकमंत्र्यांचे आदेश
शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा; पालकमंत्र्यांचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2025 | मंगळवार
गावकऱ्यांचा भन्नाट निर्णय! स्वतःची शेती सोडून 15 पाणंद रस्ते खुले, पुण्यातील 'या' गावाला राज्य सरकारनं दिला मानाचा मुजरा
गावकऱ्यांचा भन्नाट निर्णय! स्वतःची शेती सोडून 15 पाणंद रस्ते खुले, पुण्यातील 'या' गावाला राज्य सरकारनं दिला मानाचा मुजरा
Gold Market : भारतातील सर्वात मोठं सोन्याचं मार्केट 'या' शहरात, तिथून देशभरात सोन्याचा पुरवठा, सोनं स्वस्त मिळतं का? 
भारतातील सर्वात मोठं सोन्याचं मार्केट 'या' शहरात, देशातील गोल्ड कॅपिटल कोणत्या शहरात?
Embed widget