एक्स्प्लोर

Tomato Price : टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री

महाराष्ट्रातील अनेक शहरात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. या टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Tomato Price : सध्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर त्याठिकाणी एक किलो टोमॅटोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. दर  ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनपूर्व पावसामुळं टोमॅटोची काढणी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर वाढले आहेत.

दरम्यान, जास्त उष्णतेमुळं उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा कमी टोमॅटोची आवक आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे.

मार्चमध्ये कमी लागवडी 

याबाबत एबीपी माझा डीजिटलने टोमॅटो उत्पादक शेतकरी शिवाजी आवटे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, टोमॅटोचे दर हे जून महिन्यात वाढण्याची शक्यता 15 फेब्रुवारीलाच वर्तवली होती. 2021 मधील जून ते ऑगस्ट हा काळ टोमॅटोसाठी फार मोठ्या मंदीचा कालावधी ठरला होता. तसेच यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचे आवटे म्हणाले. जून, जुलै हे टोमॅटोसाठी चांगल्या भावाची शक्यता असलेले महिने असतात असेही शिवाजी आवटे यांनी सांगितले. मार्च 2022 मध्ये देखील टोमॅटोच्या कमी लागवडी झाल्या आहेत. त्यातच टुटा CMV ची दहशत होती. एप्रिल पर्यंत टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण खूप कमी राहिले. मे महिन्यात जसे दर वाढले, तसे सर्वांची लागवडीसाठी धडपड सुरु झाली असे आवटे यांनी सांगितले.  

थेट शेतकऱ्यांना फायदा

सध्या टोमॅटोच्या दराने शंभरीपार केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. टोमॅटो स्टोअर करता येत नाही. त्यामुळे त्याची लगेच विक्री करावी लागते. त्यामुळे व्यापारांना त्यामध्ये फार काही करता येत नाही. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दर वाढण्याचे कारण म्हणजे मार्च महिन्यात लागवडी कमी झाल्या. 10 टक्के सुद्धा लागवडी झाल्या नाहीत. तसेच उन्हाळ्यामध्ये रोगराईचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवडी कमी केल्या परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये जर टोमॅटो लावले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार होता असा अंदाजी काही तज्ञ शेतकऱ्यांनी वर्तवला होता. ज्यांनी मार्चमध्ये लागवडी केल्या त्यांचा शेतमाल सध्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget