एक्स्प्लोर
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या साडे सात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा अग्रीम रकमेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार येत्या महिन्याभरामध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देणे बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम मिळणार
1/5

महाराष्ट्रात यंदा राज्याच्या विविध भागात काही कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती. या काळात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झाल्या शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.
2/5

परभणी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील जवळपास चार लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं मोठं नुकसान झालं होतं.
3/5

परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी नेत्यांनी केली होती. महसूल प्रशासनाकडून पंचनामे देखील करण्यात आले होते. मात्र, पीक विम्यापोटी अग्रीम रक्कम मिळण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आलेली नव्हती.
4/5

अखेर परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम देण्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळं परभणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
5/5

परभणी जिल्ह्यातील 7 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता या सर्व शेतकऱ्यांना आता 25% अग्रीम रक्कम मिळणार आहे. ही रक्कम ही जवळपास 350 कोटींपेक्षा जास्त असणार आहे.
Published at : 02 Oct 2024 09:50 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















