एक्स्प्लोर

Agriculture News : कोथिंबीरच्या दरात घसरण, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यानं एक एकर कोथिंबीरवर फिरवला रोटर 

Agriculture News : कोथिंबीरला (coriander crop) भाव नसल्यामुळं एका शेतकऱ्यानं संपूर्ण एक एकर क्षेत्रावरील कोथिंबीरीवर ट्रॅक्टरने रोटर फिरवला आहे.

Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी संकटात आहे. एकीकडं आस्मानी संकट आहे, तर दुसरीकडं सुलतानी संकट आहे. या दोन्ही संकटात शेतकरी मात्र भरडला जातोय. राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं शेतमालाला योग्य तो दर नसल्यानं शेतकऱ्यांना फटका बसतोय. कोथिंबीरला (coriander crop) भाव नसल्यामुळं एका शेतकऱ्यानं संपूर्ण एक एकर क्षेत्रावरील कोथिंबीरीवर ट्रॅक्टरने रोटर फिरवला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांधे गावचे गोरखदादा आवारी असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 

कोथिंबीरीला भाव नसल्यामुळे गोरखदादा यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या पिकाचा उत्पादन खर्चही निघणं कठिण झालं होतं. त्यामुळं त्यांनी संपूर्ण एक एकर कोथींबीरीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. शेतीमालाला भाव नाही, पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगवा की मरावं? सरकारनं लवकरात लवकर हमीभाव  ठरवून दिला पाहिजे नाहीतर एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल असे शेतकरी आवारी म्हणाले. 

पिकाचा उत्पादन खर्चही निघणं कठिण

एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसरीकडे एकही भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दर घसरल्याने शेतकरी संतप्त असून दुसरीकडे सरकार वारंवार आश्वासन देत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे कांद्याला कांद्याला भावच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर नांगर फिरवल्याचे देखील दिसून आले. कांद्याबरोबर इतर पीक घेणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लागवड केलेल्या पिकातून उत्पादन खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नाही.

दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच नाशिक जिल्ह्याती दिंडोरी तालुक्याती एता शेतकऱ्यानं कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने शहरातील दिंडोरी नाका परिसरात कोथिंबीर फुकट वाटली होती. शेतकरी जर जगला तर सगळे लोक जगतील. मध्यमवर्गीय असतील, मोठे लोक असतील, गोरगरीब असतील सगळे शेतीमालावर अवलंबून आहे. मात्र जर कचऱ्यापेक्षा वाईट परिस्थिती जर शेती मालाची आहे. त्यामुळे आज रस्त्यावर आम्हाला यायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना तिथे बाजार समिती रेट देत नसल्याची भूमिका शेतकऱ्याने व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

साहेब आम्ही मरायचं का? शेतकऱ्यांने कोथिंबीर फुकट वाटली, नाशिककरांची झुंबड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mundhwa Land Scam: 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' मुंडवा जमीन घोटाळा पेटला, पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोप
Mahayuti Election: राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, सामंतांचा हल्लाबोल
Maha Politics: 'युतीतच लढू', नारायण राणेंचा शब्द; वडील-मुलामध्ये मतभेद, नितेश राणेंचा स्वबळाचा नारा
Mahayuti Election : 'आगामी निवडणुका स्वबळावर लढू', Ajit Pawar यांचे संकेत; महायुतीत मतभेद?
Matoshree Drone Row: 'कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते?', Aaditya Thackeray यांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget