एक्स्प्लोर
Ramdas Kadam on BJP : रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही : रामदास कदम
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेना सोडणार नाही..असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी आक्रमक भूमिका घेतली..इतकंच नाही तर त्यांनी भाजपवर हल्लाबोेल पण केलाय..सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का?, असा सवाल कदमांनी भाजपला केलाय.. कालच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भाजप ही जागा लढवणार आहे. असं ट्विट केलं होतं..त्यातच आता रामदास कदमांनी भाजपवर टीका केलीय.. त्यामुळे कोकणातील जागांवरुन महायुतीतील धुसफूस समोर आलीय..
आणखी पाहा























