एक्स्प्लोर

Zero Hour Full : उद्धव ठाकरेंचा मविआला रामराम? ते पवार कुटुंब पुन्हा एकत्र? सविस्तर चर्चा

नमस्कार मी, विजय साळवी... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत..

गर्व से कहो हम हिंदू है... अशी गर्जना राष्ट्रीय राजकारणात पहिल्यांदा करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीतल्या हिंदुत्वासाठी देशभर ओळखलं जायचं. मंडळी, तो एक काळ होता.. काटक शरीरयष्टी असलेले बाळासाहेब ठाकरे... खांद्यावर भगवी शाल ओढून... जेव्हा मंचावर यायचे.. तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्क असो.. किंवा परभणीतील इंदिरा मैदान असो.. प्रत्येक ठिकाणी जनसागर ओसंडून वाहात असायचा.. सभांमधून हिंदुत्वाचा एल्गार व्हायचा...

इतकंच काय तर नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरेंना देशात हिंदुत्वाचा पोस्टरबॉय म्हणून लोकमान्यता मिळाली होती... आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या बळावर त्यांच्या शिवसेनेला मिळालेली सत्ता.. साऱ्या महाराष्ट्रानं पाहिली.. त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाचे देशभर चाहते तयार झाले होते.. त्या काळात बाळासाहेबांना मानणारा वर्ग देशभर इतका मोठा होता की उत्तर प्रदेशात त्यांच्या शिवसेनेचा आमदारही विधानसभेत निवडून आला. त्यांनी १९८६ साली विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत धर्माच्या मुद्द्यावर प्रचार केला, या कारणामुळं त्यांना सहा वर्षांसाठी मतदानाचा अधिकार गमावला होता..

मंडळी.. हिंदुत्वाच्या त्याच लाटेवर भारतीय जनता पक्ष स्वार झाला.. आणि त्याच हिंदुत्वाच्या एकतेची ताकद आपल्याला आज राष्ट्रीय राजकारणात दिसतेय.

भाजप पक्ष म्हणून मोठां झाला.... तशीच शिवसेनाही राज्यव्यापी बनली.. बाळासाहेबांनीही उतारवयात शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती दिलं.. पण, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे बाळासाहेबांसारखं आक्रमक नव्हतं.. उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभावच शांत.. आणि संयमी आहे. पुढे आदित्य ठाकरेंनीही पक्षाला नव्या पिढीचा.. तरुणांचा पक्ष बनवण्यासाठी अनेक गोष्टी बदलल्या... परिणामी काळाच्या ओघात आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची आक्रमकता कमी झाली.. पण पक्ष सत्तेत राहत होता.. अगदी २०१९ सालीही शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्याची संधी मिळाली होती. पण, तेव्हा त्यांनी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं.. आणि पुढे काय काय झालं.. हे मी काही नव्यानं सांगणार नाही..

पण मंडळी.. गेल्या पाच वर्षात एक गोष्ट मात्र नक्की झाली... ती म्हणजे भाजपकडून आणि एकनाथ शिंदेंकडून प्रामुख्यानं मराठी जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला.. ती म्हणजे..

उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जात हिंदुत्व सोडलं.. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसाही त्यांनी सोडून दिला..

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. राज्यातल्या मतदारांनी त्यांना नाकारल्याचं आकडेवारीतून दिसलं..
त्यामुळं महापालिकेच्या आगामी निवडणुका उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं अस्तित्व दाखवून देण्याची संधी ठरणार आहे.

त्यातही एखाद्या राज्यापेक्षा मोठं बजेट असलेली मुंबई महापालिका सर्वात महत्त्वाची आहे. गेल्या अडीच दशकांपासून मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. या मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात कोणत्याही दिवशी जाहीर होईल.. त्यामुळं मुंबई महापालिका आपल्या हातात राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचाच पॅटर्न हाती घेतल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. 

मंडळी.. पाण्यावर काठी मारली तर पाणी वेगळं होतं, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं. पण शरद पवारांच्या सख्ख्या पुतण्याच्या म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतून अजितदादा ते थेट सत्ताधारी महायुतीत जाऊन बसले. 

त्यामुळं राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. पण राज्यातल्या राजकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि मग त्या फुटीनं पवार कुटुंबही दुभंगलं. आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीनं पवार कुटुंबीयांमधला दुरावा आणखी वाढला. त्यांची दिवाळीही वेगवेगळी साजरी झाली.

पण आता शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची काल दिल्लीत भेट घेतली आणि पवार कुटुंबीयांच्या मनात... राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातही त्या दोघांनी एकत्र यावं अशी भावना निर्माण झाली आहे. कारण अजितदादांनी थोरल्या काकांची घेतलेली ही भेट पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारा ठरला होता.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आई आणि अजित पवारांच्या वहिनी सुनंदा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पवारसाहेब आणि अजितदादांनी कुटुंब म्हणून एकत्र यावं ही भावना बोलून दाखवताना सुनंदाताईंनी राजकारणावर थेट भाष्य करणं मात्र आवर्जून टाळलं. पाहूयात त्या काय म्हणाल्या आहेत?

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Embed widget