एक्स्प्लोर

IND vs PAK: 'मानलं रे भाऊ...' सूर्यकुमार यादवचं विराट कोहलीसाठी थेट मराठीतून ट्वीट

Suryakumar Yadav On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात भारतीय संघानं त्यांच्या पहिल्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला.

Suryakumar Yadav On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात भारतीय संघानं त्यांच्या पहिल्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला. मेलबनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) पाकिस्तानच्या तोंडातून विजयी घास हिसकावला. त्यानं 53 चेंडूत नाबाद 82 धावांचं मोलाचं योगदान देत भारताला विजय मिळवून दिला. विराटच्या या अफलातून खेळीचं जगभरातून कौतुक केलं जातंय. अनेक दिग्गज खेळाडू विराटची पाठ थोपावत आहेत. यातच भारताचा आक्रमक फलंदाज सूर्युकमार यादवनंही (Suryakumar Yadav) ट्विटरच्या माध्यमातून विराटचं कौतूक केलं. मात्र, सुर्यानं केलेलं ट्वीट मराठीतून असल्यानं त्याच्या ट्विटची अधिक चर्चा रंगलीय.

पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयानंतर सूर्यकुमार यादवनं भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीसाठी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मराठीत 'मानलं रे भाऊ...' असं लिहलं.  दरम्यान, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटला त्याच्या अफलातून खेळीसाठी शुभेच्छा दिल्या. पण सुर्याचं ट्विट सर्वात आकर्षित ठरलं.

सूर्यकुमार यादवचं ट्वीट-

 

अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. अर्शदीपनं पाकिस्तानचा कर्णधार बाबरला शून्यावर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतरही भारतानं गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. अवघ्या चार धावांवर असताना रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं आठ चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी तीन-तीन तर मोहम्मद शमी भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

विराटच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताचा चार विकेट्सनं विजय
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget