एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Team India : टीम इंडियाच्या अंतिम 11 मध्ये 'हे' तीन बदल व्हायलाच हवे, हरभजन सिंह स्पष्टच म्हणाला...

T20 WC 2022 Stats : भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. पाकिस्तान, नेदरलँडला मात दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र भारताला सामना गमवावा लागला. 

Team India Playin 11 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभूत केलं. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये तीन महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या तीन सामन्यांतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरी पाहता त्याने हा सल्ला दिला आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना हरभजन म्हणाला, 'टीम इंडियाला आता काही मोठे निर्णय घ्यावेच लागतील. केएल राहुल उत्तम खेळाडू आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण सध्या तो त्याच्या खराब फॉर्मशी झगडत असेल तर त्याच्या जागी ओपनिंगमध्ये ऋषभ पंतला संधी द्यायला हवी असे मला वाटते.'

'पंतला संधी द्या'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाठीला दुखापत झाल्याने दिनेश कार्तिकला सामन्याच्या मध्येच बाहेर जावे लागले होते. त्याच्या जागी ऋषभ पंतने उर्वरित सामन्यात विकेटकीपिंग केले. यावर बोलताना हरभजन म्हणाला, 'कार्तिक जखमी दिसत आहे. त्याची स्थिती काय आहे हे मला माहीत नाही. जर तो तंदुरुस्त नसेल तर ऋषभ पंत विकेटकीपर म्हणून टीम इंडियासाठी संघात येऊन राहुलच्या जागी खेळू शकतो. तसंच मधल्या फळीत कार्तिकऐवजी दीपक हुडा फलंदाजीची धुरा सांभाळू शकतो. तसंच तो एक अतिरिक्त फिरकी गोलंदाजाचा पर्यायही संघाला देतो.

आर अश्विनच्या जागी युझवेंद्र चहल

हरभजन तिसरा बदल सूचवताना म्हणाला,'अश्विनऐवजी युझवेंद्र चहलला संधी द्यायला हवी. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. चहल हा सामना जिंकणारा गोलंदाज आणि T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. संघात त्याच्यापेक्षा चांगला लेग स्पिनर आहे असे मला वाटत नाही. त्याला प्लेईंग-11 मध्ये न घेणे ही मोठी चूक आहे. असंही हरभजन म्हणाला.

उर्वरीत सामने टीम इंडियासाठी महत्त्वाचे

स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं. 

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget